ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला जाब
पुणे : पुणे जिल्ह्यातील मांजरी स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेले बेमुदत उपोषण तीव्र झाले आहे. उपोषणकर्ते विद्यार्थी राहुल धनवे यांची प्रकृती आणखी खालावली असून, त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली असून, त्यांच्या यकृतावरही परिणाम होण्यास सुरुवात झाल्याचे डॉक्टरांनी सूचित केल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा दिला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट करत म्हटले की, VBA मांजरी येथे आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. विद्यार्थ्यांची सन्मान, न्याय, सुरक्षित वसतिगृहे, विमा, शैक्षणिक मदत आणि समान संधी यांसाठीची लढाई पूर्णपणे न्याय्य असल्याचे त्यांनी म्हटले.
Also Read : जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश
तसेच, विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष किंवा त्यांचा आवाज दडपला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सवाल उपस्थित केला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी अद्याप संवाद का साधला गेला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आदिवासी विद्यार्थ्यांप्रती सरकारची उदासीनता ही आदिवासीविरोधी मानसिकतेचे प्रतिबिंब आहे का, असा थेट सवालही त्यांनी केला.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात आमरण उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा युवा नेते सुजातदादा आंबेडकर हे आज, मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी भेट घेणार आहेत. यावेळी ते उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या व आंदोलनाची भूमिका जाणून घेणार असून, त्यानंतर दुपारी ३ वाजता पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. दरम्यान, सरकारने विद्यार्थी प्रतिनिधींशी तातडीने सकारात्मक चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा आणि उपोषणकर्त्या विद्यार्थ्याच्या प्रकृतीची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
Also Read : पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर
विद्यार्थ्यांच्या सन्मान, न्याय, सुरक्षित वसतिगृहे, विमा, शैक्षणिक मदत आणि समान संधी यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारकडून आंदोलनाची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप विद्यार्थी प्रतिनिधींनी केला आहे. दरम्यान, विद्यार्थी प्रतिनिधी सौरभ भांडे, सूरज कोकणे, नीलेश सोनवणे, रवींद्र लोटे यांच्यासह अन्य विद्यार्थी आदिवासी विकासमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, सुमारे आठ तास प्रतीक्षा करूनही त्यांची भेट होऊ शकली नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार
पुणे : पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाची वंचित बहुजन आघाडीने दखल घेतली आहे....
Read moreDetails






