नाशिक : निफाड तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दौरा करून पाहणी केली. यावेळी पूरग्रस्त कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पूरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कुटुंबे अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून आर्थिक मदत, अन्नधान्य, निवारा व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.
शासनाने पूरग्रस्तांना तातडीने मदत न केल्यास पूरग्रस्त नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी चेतन गांगुर्डे यांनी दिला. या दौऱ्यावेळी मोठ्या संख्येने पूरग्रस्त कुटुंबीय तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





