पुणे : अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटन भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव जी महाराज यांच्या दुःखद निधनानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून सुखदेव जी महाराज यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, सुखदेव जी महाराज यांचे निधन अत्यंत वेदनादायी असून समाजप्रबोधन आणि संत गुरु रविदास महाराज यांच्या विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी आयुष्यभर महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या जाण्याने रविदासिया समाजासह संपूर्ण समाजजीवनाची मोठी हानी झाली आहे. (Sukhdev Maharaj)
Also Read : इतिहासाची छेडछाड: भिडे वाड्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न? बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकावरून नवा वाद
सुखदेव जी महाराज यांचे साधेपण, प्रभावी नेतृत्व आणि समाजाविषयीची निष्ठा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली होती. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्य केले, असेही आंबेडकर यांनी नमूद केले. (Sukhdev Maharaj)
Also Read : FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!
वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकर परिवाराच्या वतीने सुखदेव जी महाराज यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि अनुयायांप्रती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.




