Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

कामगारांचा असंतोष आणि आर्थिक धोरणे: केवळ वेतनवाढ पुरेशी आहे का?

mosami kewat by mosami kewat
April 19, 2026
in article, अर्थ विषयक
0
कामगारांचा असंतोष आणि आर्थिक धोरणे: केवळ वेतनवाढ पुरेशी आहे का?
       

– संजीव चांदोरकर 

गुरगाव, नोएडा मधील झालेल्या कामगारांच्या आंदोलनाच्या निमित्ताने…

कोणत्याही कुटुंबाचे राहणीमान दोन गोष्टींमुळे निर्णयीत होते : त्या कुटुंबांची आमदनी आणि त्या कुटुंबांना करावे लागणारे खर्च!

देशातील कामगारांचे वेतनमान वाढवण्याची गरज आहेच, पण शिक्षण, आरोग्यासारख्या क्षेत्राच्या खाजगीकरणामुळे त्यांच्या कुटुंबांचे जे अत्यावश्यक खर्च वाढत आहेत…ती आर्थिक धोरणे पुन्हा एकदा सार्वजनिक क्षेत्र केंद्री, जनस्नेही करण्याची देखील गरज आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्ली जवळील गुरगाव/ नोएडा आणि परिसरात तेथील उद्योगांमध्ये काम करणारे हजारो कामगार रस्त्यावर उतरले. हिंसक आंदोलन झाले. 

काय मागण्या होत्या त्यांच्या? आमचे वेतनमान वाढवून द्या! 

हरयाणा आणि उत्तरप्रदेश सरकारांनी तातडीने हालचाली करून किमान वेतनमान वाढविण्यासाठी अध्यादेश काढले. सध्या तरी आंदोलन थंडावले आहे. 

सर्वप्रथम हे लक्षात घ्यावयास हवे की ज्यावेळी सामान्य नागरिक/ कामगार/ कष्टकरी/ शेतकरी/ आदिवासी…मोठ्या संख्येने सहभागी होऊन अचानक आंदोलन करतात तो प्रश्न त्याआधी अनेक वर्षे जळत असतो. तक्रारी केल्या जातात. त्यांची दखल घेतली जात नाही. सहनशक्तीचा कडेलोट होतो आणि अचानक आंदोलन पेटते. इथे देखील तेच घडले आहे. 

उदा. उत्तरप्रदेशने आता जे किमान वेतन वाढवले ते तब्बल चौदा वर्षांनी आणि हरयाणा सरकारने तब्बल दहा वर्षांनी…काय ही सरकारे हिंसक आंदोलन होण्यासाठी थांबली होती असे म्हणायचे? 

नॅशनल कॅपिटल रिजन मधील आंदोलन थंडावले असले तरी अशी आंदोलने देशांत भविष्यात इतरत्र उभी राहू शकतात. कारण गुरगाव, नोएडा मधील कामगारांमध्ये ज्या कारणांमुळे अनेक वर्षे असंतोष साचत गेला ती कारणे देशांत अनेक ठिकाणी कार्यरत आहेत..

ती कारणे अशी 

कमी वेतन, वाट्टेल तेव्हढे कामाचे तास, ओव्हरटाईमसाठी जास्त मोबदला न मिळणे, अनेक ठिकाणी कंत्राटदार मार्फत नोकरी मिळणे आणि कंत्राटदाराने कंपनीकडून मिळणाऱ्या वेतनातील मोठा वाटा स्वतःच्या खिशात टाकणं, नोकरीची अनिश्चितता, कामाच्या ठिकाणी किमान सुविधा नसणे, जीवावरचे काम, कामावर जायबंदी झाल्यास पुरेशी वैद्यकीय मदत, उपचार न मिळणे, नोकरी जाण्याची भीती, कारण दुसरा कोणी तरी काम करायला गेट बाहेर उपलब्ध असणे, तुच्छतेची वागणूक, आत्मसन्मान आणि म्हणून आत्मविश्वास गमावणे…. इत्यादी.

देशातील शहरी भागातील अनेक छोट्या मोठ्या उद्योगात काम करणारे कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगार स्थलांतरित आहेत. त्यांना घरांच्या सोयी नाहीत. दाटीवाटीने भाड्याच्या घरांत राहतात. त्यांना गावाकडे नियमित पैसे पाठवावेच लागतात. उरलेल्या पैशात शहरात रहावे लागते. अर्धे चित्त गावाकडील आईवडील, बायको, लहान मुलांकडे असते. अशी कोणतीही व्यक्ती भावनिक ताणतणावात असते. 


       
Tags: developmentEconomic financialeconomic policyenvironmentPoliticalWorker
Previous Post

काळजाचा थरकाप! चंपावतमध्ये सराव करताना विद्यार्थ्याच्या गळ्यात घुसला भाला;  तरुणाचा दुर्दैवी अंत

Next Post

‘अंतरीचे दीप’ ला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

Next Post
‘अंतरीचे दीप’ ला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

'अंतरीचे दीप' ला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
बातमी

परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

by mosami kewat
June 19, 2026
0

पुणे : NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, या प्रकरणासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरत त्यांच्या...

Read moreDetails
16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

June 19, 2026
चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

June 19, 2026
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

June 19, 2026
नांदेड : लेबर कॉलनी येथे नवीन डीपीचे उद्घाटन; नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून दिलासा

नांदेड : लेबर कॉलनी येथे नवीन डीपीचे उद्घाटन; नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून दिलासा

June 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home