औरंगाबाद : गॅस सिलेंडर टंचाईच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज औरंगाबाद येथे “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” या राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी चुलीवर भाकर बनवली. आणि जिल्हाधिकाऱ्यांना तयार केलेले जेवण, मागण्यांच्या निवेदनासह देण्यात येणार आहे.
Also Read : भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर
देशभरात गॅस सिलेंडरची टंचाई वाढत असून सामान्य नागरिकांना सिलेंडरसाठी दीर्घ रांगा लावाव्या लागत आहेत. यासाठी केंद्र सरकारचे नरेंद्र मोदी जबाबदार असून गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित करावा, अश्या विविध मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. (Gas Cylinder Shortage)
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत.





