यवतमाळ : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोर्चात सहभागी होणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात यवतमाळ पश्चिम जिल्हाध्यक्ष डी. के. दामोधर यांच्या नेतृत्वाखाली टोल प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात दिनांक 23 मार्च 2026 रोजी नागपूर (Nagpur) येथील आरएसएस (RSS) मुख्यालयावर संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते नागपूरकडे रवाना होणार आहेत. (Nagpur Protest)
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहराजवळ तुळजापूर–नागपूर महामार्गावर बिजोरा (ता. महागाव) येथे असलेल्या टोल नाक्यावरून मोठ्या प्रमाणात वाहने जाणार असल्याने, या वाहनांकडून कोणत्याही प्रकारची टोल आकारणी करू नये, तसेच कार्यकर्त्यांना अडवू नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. (Nagpur Protest)
टोल नाक्यावर कार्यकर्त्यांची अडवणूक किंवा गैरसोय झाल्यास अनुचित प्रकार घडू शकतात आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित टोल प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर महागाव तालुका अध्यक्ष अंकुश कोकरे, धम्मदीप काळबांडे, सयाजीराव कांबळे, अरविंद गरडे, धनंजय ढगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये ‘वंचित’चे प्रशासनाला निवेदन
यवतमाळ : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोर्चात सहभागी होणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याची...
Read moreDetails





