Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

पीक विमा कंपन्यांचा ५०,००० कोटी नफा : शेतकऱ्यांच्या अश्रूंवर उभारलेले साम्राज्य

mosami kewat by mosami kewat
September 17, 2025
in अर्थ विषयक
0
पीक विमा कंपन्यांचा ५०,००० कोटी नफा : शेतकऱ्यांच्या अश्रूंवर उभारलेले साम्राज्य

पीक विमा कंपन्यांचा ५०,००० कोटी नफा : शेतकऱ्यांच्या अश्रूंवर उभारलेले साम्राज्य

       

– संजीव चांदोरकर

गेल्या ५ वर्षात देशात पीक विमा धंद्यातून विमा कंपन्यांनी तब्बल ५०,००० कोटी रुपये नफा कमावला आहे. त्यापैकी फक्त महाराष्ट्रातून १०,००० कोटी पेक्षा जास्त कमावले आहेत

साहजिकच या विमा कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये सेलिब्रेशन असेल. त्या कंपन्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर्स आणि उच्च पदस्थ बोनस घेत असतील , त्या कंपन्यांचे किंवा त्यांच्या स्पॉन्सर कंपन्यांचे शेअर्स वधारतील, जगात तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताच्या पीक विमा उद्योग भविष्यात किती वाढू शकतो याची प्रेझेंटेशन्स जागतिक गुंतवणूकदारांकडे केली जात असतील.

आणि जानेवारी ऑगस्ट २०२५ या आठ महिन्यात फक्त महाराष्ट्रात ११०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

(हे महाराष्ट्रातील. फक्त आठ महिन्याचे. तुलना करण्यासाठी खरेतर पूर्ण देशातील शेतकरी आत्महत्यांचे पाच वर्षाचे आकडे हवेत. पण माझी तेव्हढी हिम्मत नाही)

आत्महत्या न केलेले शेतकरी सुखात असतात , म्ह्णून ते आत्महत्या करत नाहीत असे ते नाहीये, आत्महत्या केलेले शेतकरी जात्यात तर अनेक इतर शेतकरी सुपात आहेत हे नमूद करून पुढे जाऊया.

आपल्या देशात (१) मोठ्याप्रमाणावर शेतकरी अल्प व मध्यम भूधारक आहेत, (२) सिंचनाच्या सोयींच्या अभावी बहुसंख्य शेतकऱ्यांची शेती निसर्गाच्या लहरीवर अवलंबून आहे, (३) शेतीसाठी लागणाऱ्या खते, कीटकनाशके, मजुरी यांचे भाव चढते, पण पीक हातात आल्यावर मात्र किती पैसे मिळणार याबद्दल अनिश्चितता अशा दुहेरी कात्रीत कोट्यवधी शेतकरी पिढ्यानपिढ्या सापडले आहेत आणि (४) आणि पर्यावरणातील बदलांमुळे गंभीर पर्यावरणीय अरिष्टे (उदा अतिवृष्टी) दर मौसमात वाढतच आहेत

विमा कंपन्याचे बिसिनेस लॉजिक / मॉडेल कसे चालते –

(१) जास्तीत जास्त स्टॅण्डर्डायझेशनवर चालतात,
(२) क्लिष्ट नियमावली बनवतात,
(३) प्रचंड कागदोपत्री किंवा ऑनलाईन पुरावे मागतात,
(४) ऑपरेटिंग कॉस्टस कमी ठेवण्यासाठी कमीतकमी कार्यालये, कमीतकमी अधिकारी, कर्मचारी नेमतात
(५) एकदम टाईट डेडलाईन्स ठेवतात.

भारतीय शेतकऱ्यांमधील वित्त आणि डिजिटल साक्षरतेच्या अभावामुळे वेळेवर औपचारिकता पूर्ण करण्याचा हा प्रश्न अधिक उग्र बनतो

विमा कंपन्याची एक नजर सतत नफ्यावर म्हणजेच यावर्षी प्रीमियम किती गोळा झाला आहे आणि नुकसानभरपाई किती द्यावी लागणार यावर असतो. त्यानुसार अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या असतात. उदा सतत नियमावर बोट ठेवत क्लेम्स रेशो कसा कमी राहील हे बघा

(हे सर्व आरोग्य विमा उद्योगाला देखील तंतोतंत लागू होते)

अतिशय गुंतागुंतीची वित्तीय प्रॉडक्ट रिचवण्यासाठी समाजाने साक्षरतेची, समजेची एक विशिष्ट पातळी आणि नागरिकांनी किमान काही क्रयशक्ती कमवावी असली पाहिजे. हे तत्व काही नवीन नाही. मुलांना, रोपांना वाढवताना केव्हा काय करायचे याची अनेक मार्गदर्शक तत्वे आहेत. ती अमलात आहेत कारण त्यात हिडन अजेंडा नसतो.

इथे आहे. पिक विमा सारखी अनेक वित्तीय प्रॉडक्ट शासनाच्या लोककल्याणाकरी जबाबदाऱ्या टाळण्यासाठी एक कव्हर म्हणून वापरली जात आहेत.

भारतातील कोट्यवधी नागरिक शैक्षणिक / डिजिटल दृष्ट्या अजूनही मागासलेले असताना , वित्तीय प्रॉडक्ट्स रिचवण्याएवढी त्यांची क्रयशक्ती नसतांना त्यांच्यावर हे सगळे लादणे हे अमानवी आहे

(१७ सप्टेंबर २०२५) जुन्या पोस्टवर आधारीत


       
Tags: Agrarian CrisisAgriculture in IndiaCrop InsuranceDigital IlliteracyFarmer SuicidesInsurance Companies ProfitMaharashtra FarmersRural Distress
Previous Post

Solapur : अक्कलकोट तालुक्यात नागणसूर येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उदघाटन

Next Post

Pune Students Protest : पुण्यात संशोधक फेलोशिपसाठी विद्यार्थी आक्रमक; ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांची घेतली भेट

Next Post
पुण्यात संशोधक फेलोशिपसाठी विद्यार्थी आक्रमक; ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांची घेतली भेट

Pune Students Protest : पुण्यात संशोधक फेलोशिपसाठी विद्यार्थी आक्रमक; ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांची घेतली भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
खळबळजनक! ‘अंधार पडू द्या मग पैसे वाटू’; भाजप आमदार नारायण कुचेंची ऑडिओ क्लिप व्हायरल
Uncategorized

खळबळजनक! ‘अंधार पडू द्या मग पैसे वाटू’; भाजप आमदार नारायण कुचेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

by mosami kewat
January 22, 2026
0

औरंगाबाद : निवडणुकीच्या रणधुमाळीत आता ऑडिओ क्लिपच्या राजकारणाने वातावरण तापले आहे. भाजप आमदार नारायण कुचे यांची एक ऑडिओ क्लिप सध्या...

Read moreDetails
महाराष्ट्र महानगरपालिका आरक्षण सोडत जाहीर: मुंबई, पुणे, नागपूर ‘सर्वसाधारण’ तर ठाणे ‘SC’ साठी राखीव

महाराष्ट्र महानगरपालिका आरक्षण सोडत जाहीर: मुंबई, पुणे, नागपूर ‘सर्वसाधारण’ तर ठाणे ‘SC’ साठी राखीव

January 22, 2026
सत्तेसाठी ‘काहीही’! अचलपूरमध्ये भाजप-MIMची युती

सत्तेसाठी ‘काहीही’! अचलपूरमध्ये भाजप-MIMची युती

January 22, 2026
जातीय द्वेषातून भोगावात ४० एकर ऊस खाक; ‘वंचित’ आक्रमक, तहसीलवर धडक मोर्चा

जातीय द्वेषातून भोगावात ४० एकर ऊस खाक; ‘वंचित’ आक्रमक, तहसीलवर धडक मोर्चा

January 22, 2026
भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home