Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home सामाजिक

आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रस्थापित राजकीय पक्षांचे तोंडावर बोट का?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 22, 2024
in सामाजिक
0
आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रस्थापित राजकीय पक्षांचे तोंडावर बोट का?
0
SHARES
117
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

आकाश शेलार

आज शहरात आणि खेड्यांत जो ओबीसी समाज मध्यमवर्गीय म्हणून राहत आहे. त्याचे श्रेय जाते मंडल आयोगाला. व्ही. पी. सिंग यांच्या सरकारमध्ये मंडल आयोग लागू व्हावा म्हणून संसदेत भूमिका मांडणारे आणि मंडल आयोग लागू करून घेणारे ॲड. बाळासाहेब आंबेडकर होते. १९९० या काळात बहुजनांच्या हिताच्या अनेक गोष्टी अवघ्या १३ महिन्यांच्या कार्यकाळात पार पडल्या. ज्या काँग्रेसच्या काळात पूर्ण होऊ शकल्या नाहीत. परिवर्तनाचे राजकारण काय असते हे त्यावेळी बाळासाहेबांनी दाखवून दिले. याबाबत सध्याच्या अनेक युवकांना कदाचित माहिती नसेल. तेव्हापासून आजतागायत बाळासाहेबांची भूमिका तसूभरही बदललेली नाही.

मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले, तेव्हा बाळासाहेब हे मनोज जरांगे यांना भेटले होते. बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका घेतली होती. मात्र, त्यांनी वेळोवेळी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असावे हे सुद्धा स्पष्ट केले होते. अशी ठाम आणि स्पष्टभूमिका घेणारे राज्यात बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेतृत्व आहे. नेते आहेत.

राजकीय पंचाईत होऊ नये म्हणून अनेक पक्ष भूमिका घ्यायला घाबरत आहेत. परंतु, प्रस्थापित पक्षांनी भूमिका न घेतल्याने आज ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचे दिसत आहे. जात हा घटक पुन्हा डोकं वर काढून उभा राहत आहे. अशा वेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी काढलेली आरक्षण बचाव यात्रा आशादायक असेल. ओबीसींच्या मनात त्यांचे आरक्षण संपते की काय ? अशी भीती आहे. एस. सी. /एस. टी यांची परिस्थिती देखील तशीच आहे. परंतु, कोणताही राजकीय पक्ष स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही. आरक्षणाचे घोंगडे भिजत ठेवले आहे. आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर जातीय तेढ कमी करतील आणि महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित होईल अशी आशा ओबीसी आणि मराठा समाजाला आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली होती. मात्र, महाविकास आघाडीचा एकही नेता या बैठकीला उपस्थित नव्हता. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना हा प्रश्न सोडवायचा नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी आहे की, ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, तर ओबीसी समूहाला ही मागणी मान्य नाही. त्यामुळे गावागावात, खेडोपाडी जातीय संघर्ष वाढत आहे. राज्याचा सामाजिक सलोखा धोक्यात आल्याचे दिसत आहे. अशावेळी प्रमुख राजकीय पक्षांनी भूमिका घेणे गरजेचे आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी वगळता याबाबत ठाम भूमिका कोणताही पक्ष घेताना दिसत नाही. त्यानं केवळ आपल्या मतांची बेरीज वजाबाकी जमते. त्यांना जनतेचा प्रश्न महत्वाचा वाटत नाही. ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते आहेत, जे केवळ मतांचं राजकारण करीत नाहीत तर कोणत्याही समाजात शांतता राहिली पाहिजे, यासाठी सुरुवातीपासून पुढाकार घेत आले आहेत.

मराठा समाज आणि ओबीसी समाज यांना झुलवत ठेवून सत्ताधारी पक्ष आणि भूमिका न घेणारे विरोधी पक्ष काय साध्य करू पाहत आहेत ? वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती की, पत्राच्या माध्यमातून या पक्षांना आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करण्यास सांगावे. मात्र, त्यांनी पत्र पाठवले की नाही आणि जरी पाठवले असले तरी यांनी भूमिका जाहीर केली की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, अशावेळी सत्ताधारी आणि विरोधक या प्रश्नाला असेच पेटवत ठेवून राजकीय पोळी भाजू इच्छित असल्याचे दिसते. मात्र, सामाजिक सलोखा धोक्यात येऊन गावोगावी जातीय संघर्ष वाढत आहे हे कुठे तरी थांबलं पाहिजे अशी भूमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आरक्षण बचाव यात्रा काढून करत आहे.

फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र जातीच्या अग्नीत जळू नये आणि सामाजिक सलोखा अबाधित रहावा, यासाठी राजकीय पक्षांनी ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. सभा, संमेलनातून फुले – शाहू – आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करण्यात सध्याच्या पुढाऱ्यांना रस आहे. मात्र, महापुरुषांना अभिप्रेत असलेला समाज स्वातंत्र्याच्या कित्येक वर्षांनंतरही हे प्रस्थापित पुढारी निर्माण करू शकलेले नाहीत.

25 जुलै रोजी ॲड..बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण बचाव यात्रेला मुंबई चैत्यभूमीतून सुरुवात होणार आहे. या यात्रेने समाजात जातीय संघर्षाने निर्माण झालेला गढूळपणा दूर होईल अशी अपेक्षा आहे. विविध ओबीसी, मराठा संघटना आणि त्यांचे नेते या यात्रेला समर्थन देत आहे. या यात्रेमुळे राज्याच्या राजकारणाला एक परिवर्तनवादी दिशा मिळेल, असा विश्वास या यात्रेच्या संयोजकांनी व्यक्त केला आहे.


       
Tags: ArakashanBachavYatraMaratha ReservationobcPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

एससी, एसटी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करा

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आरएसएसवर निशाणा

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आरएसएसवर निशाणा

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आरएसएसवर निशाणा

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी
बातमी

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी

कोल्हापूर : कोल्हापूर येथील एका व्यावसायिकाच्या घरावर ईडीची धाक पडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आले. भरत लठ्ठे नाव असून ते ...

June 21, 2025
Crime news: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या
बातमी

Crime News: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या

नवी मुंबई : मस्करीची कुस्करी झाली. तुर्भे येथील धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आली. ही घटना ...

June 21, 2025
IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा ; ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा – प्रकाश आंबेडकर

पुणे : पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बँकिंग क्षेत्रातील परीक्षा घेणाऱ्या संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल ...

June 21, 2025
Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर
बातमी

Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर

नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराष्ट्राचे ओबीसी नेते, माजी खासदार आणि विधानसभेचे विरोधी ...

June 21, 2025
कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!
बातमी

कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!

चंद्रपूर : बांधकाम कामगारांना 90 दिवसांच्या नोंदणीवर नाहरकत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी ग्रामसेवकांकडून होणाऱ्या टाळाटाळीविरोधात वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने चंद्रपूर जिल्हा ...

June 20, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क