Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

वंचितचा उमेदवार निवडून आल्यास एचएएलमध्ये नोकरीच्या संधी निर्माण करू

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 19, 2024
in राजकीय
0
वंचितचा उमेदवार निवडून आल्यास एचएएलमध्ये नोकरीच्या संधी निर्माण करू
0
SHARES
114
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिंडोरीच्या सभेतुन आश्वासन

दिंडोरी : इथल्या शिवसेनेच्या खासदाराने संसदेत कधीच मागणी केली नाही की, राफेल विमानांची निर्मिती ओझरच्या एचएएलच्या कारखान्यात करण्यात यावी. या कारखान्यात लढाऊ विमाने बनवायचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. इथून ‘वंचित’चा उमेदवार निवडून आल्यास या माध्यमातून आम्ही इथल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देऊ, असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

वंचित बहुजन आघाडीच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार मालती ढोमसे यांच्या प्रचारार्थ आयोजित पिंपळगाव बसवंत येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

आंबेडकर म्हणाले, ओझरमध्ये HAL हा विमान निर्मितीचा शासकीय कारखाना आहे. भारताने राफेल विमान खरेदीचा करार केला होता, तेव्हा 100 विमाने भारतात तयार होतील, असा निर्णय झाला होता. त्यावेळी सर्वांची मागणी होती की, देशभरातील एचएएलच्या कारखान्यात ह्या लढाऊ विमानांची निर्मिती व्हावी मात्र, पंतप्रधान मोदीने हे विमाने बनवायचे कंत्राट अनिल अंबानीला दिले. मात्र, अनिल अंबानीला लढाऊ विमाने बनवायचा कोणताही अनुभव नाही. हा विमान निर्मितीचा कारखाना कोठे आहे? हेही लोकांनां माहिती नाहीये, अशी टीकाही त्यांनी केली.

जो कोणी व्यापारी शेतमालाला हमी भावापेक्षा कमी भाव देईल, त्याला शिक्षा व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन देशात केले होते. पण, मोदीने हा कायदा केला नाही. आम्ही सत्तेत आल्यास हा कायदा करू.

कांदा उत्पादकांचे महाराष्ट्र हे आगार आहे. पण, राज्यातील आणि या भागातील शेतकऱ्याला केंद्र सरकारने वाऱ्यावर सोडलय. गुजराती व्यापाऱ्यांचा फायदा करण्यासाठी मोदीने देशातील शेतकरी मारला. गुजराती शेतकऱ्याला कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आणि महाराष्ट्रातील शेतकरी मारला.

भाव खाली – वर करणे हे व्यापारी आणि सरकारचा खेळ आहे. मालतीताई दिंडोरी मतदारसंघातून निवडून आल्यास सर्वात आधी कांद्याचे धोरण ठरवतील.

काही महिन्यांपूर्वी टोमॅटोचे भाव 15 रुपये किलोवरून 150 रुपये किलोपर्यंत अचानकपणे गेले होते. हा कृत्रिम तुटवडा व्यापाऱ्यांनी निर्माण केला होता. यातून व्यापाऱ्यांनी 45 हजार कोटी रुपये काही महिन्यात सामान्य लोकांकडून लुटले.

हा तुटवडा सरकारमान्य होता. त्याचा पैशांतून ते मतं विकत घ्यायची गोष्टी करताय.

मोदी देशाचा पंतप्रधान आहे की गुजरातचा ?

कांदा प्रश्नी सरकार निर्यात धोरण आखत नाहीये. गुजरातमधील व्यापाऱ्यांना कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आहे आणि देशातील इतर व्यापारी, शेतकरी मरायला सोडला. मोदी देशाचा पंतप्रधान आहे की गुजरातचा आहे? ज्याने फक्त गुजराती व्यापाऱ्यांचा फायदा केला.


       
Tags: DindoriLoksabhaPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

काँग्रेसच्या साजिद पठाण खानविरोधात तक्रार दाखल

Next Post

शरद पवार, उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील !

Next Post
शरद पवार, उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील !

शरद पवार, उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील !

महाबोधी महाविहार दौऱ्यात राहुल गांधी फक्त फोटो काढायला गेले होते – अॅड. प्रकाश आंबेडकर
बातमी

महाबोधी महाविहार दौऱ्यात राहुल गांधी फक्त फोटो काढायला गेले होते – अॅड. प्रकाश आंबेडकर

बोधगया, बिहार : काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहाराला भेट दिली. राहुल गांधींच्या महाबोधी मंदिर ...

June 7, 2025
विजयाच्या उंबरठ्यावरून भीतीने मागे फिरलात का मोदी?
Uncategorized

विजयाच्या उंबरठ्यावरून भीतीने मागे फिरलात का मोदी?

पुणे - आकाश शेलार भारत-पाकिस्तान संघर्ष असतो तेव्हा देशभरात गर्जना होते ‘जवाब दो, घुसून मारा’ पण जेव्हा देश खरंच घुसून ...

June 7, 2025
राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 रुग्ण सापडले, एकाचा मृत्यू
बातमी

राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 रुग्ण सापडले, एकाचा मृत्यू

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 नवे रुग्ण सापडले असून ...

June 7, 2025
मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे
बातमी

मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे

मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदार व महापालिका अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केला असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी ईडीने ...

June 7, 2025
रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर
बातमी

रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर

रायगड - किल्ले रायगडावर काल दि 6 जून रोजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 352 वा शिवराज्याभिषेक मोठ्या ...

June 7, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क