Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

विजयाच्या उंबरठ्यावरून भीतीने मागे फिरलात का मोदी?

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 7, 2025
in Uncategorized
0
विजयाच्या उंबरठ्यावरून भीतीने मागे फिरलात का मोदी?
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

पुणे – आकाश शेलार

भारत-पाकिस्तान संघर्ष असतो तेव्हा देशभरात गर्जना होते ‘जवाब दो, घुसून मारा’ पण जेव्हा देश खरंच घुसून मारायची स्थितीत येतो, तेव्हा आपलं नेतृत्व गप्प का बसतं? हाच थेट विचारलेला सवाल आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी.

ते म्हणाले की, “पाकिस्तानकडे फक्त १० दिवस पुरेल इतकाच दारुगोळा होता. आपण हल्ला करून त्यांना गुडघ्यावर आणू शकत होतो. मग आपण ही संधी गमावलीच का?” हा केवळ एक राजकीय टोला नाही, तर देशाच्या संरक्षण धोरणाला केलेला थेट सवाल आहे.

प्रकाश आंबेडकरांनी अगदी उघड शब्दांत सांगितलं की, “गल्लीत भांडण होतं तेव्हा जो भिडतो तो जिंकतो. जो गप्प बसतो त्याला ‘गांडू’ म्हणतात. देशाच्या लढाईतही तेच होतं. जेव्हा आपण माघार घेतो, तेव्हा लोक विचारतात गांडुगिरी का केली?” ही भाषा जरा उग्र वाटेल काहींना, पण यातून जनतेची मनस्थिती मांडली गेलीय. देशाच्या बाजूने भावना असलेले सामान्य लोक जे विचारतात, तेच आंबेडकरांनी थेट सरकारला विचारलंय.

संकट असं होतं की, आपल्याकडे शक्ती असूनही आपण ती वापरत नाही. अगदी मैदानात उतरलेला खेळाडू फायनलमध्ये जाऊन पाय घसरवतो, तसं झालंय. पाकिस्तानचा दारुगोळा संपत आला होता, आपल्या लष्कराकडे तयारी होती, पण वरच्या नेत्यांनी घाबरट धोरण घेतलं. हे कसलं धोरण? तुम्ही संधी का गमावली? का परत फिरलात? हेच ॲड. आंबेडकरांचे प्रश्न आहेत.

मोदी यांनी गेल्या काही वर्षांत जगभर दौरे केले. अमेरिका, फ्रान्स, रशिया कुठे कुठे गेले नाहीत. अनेक देशांचे दौरे केले, पण जेव्हा भारताला संघर्षात पाठिंबा हवा होता, तेव्हा हे सगळे देश गप्प का बसले? १९७१ मध्ये रशिया भारताच्या बाजूने उभा होता. आज तो पाकिस्तानला मदत करतो. फ्रान्सला आपण राफेल खरेदीसाठी हजारो कोटी रुपये दिले. तेही गप्प. मग हा एवढा दौरा आणि फोटोसेशन काय कामाचं?

मुंबईचा मुरली नाईक नावाचा अग्निवीर जवान भारत-पाक संघर्षात शहीद झाला. पण त्याला ‘शहीद’चा दर्जा दिला गेला नाही. त्याच्या कुटुंबाला सन्मान, मदत काहीच मिळत नाही. देशासाठी जीव देणाऱ्या माणसाला शासकीय परतावा नाही? हा जवान फक्त काही महिन्यांच्या करारावर देशासाठी लढतो आणि मेले तर त्याचं काहीच नाही? हा अपमान नाही का?

आज सरकारला प्रश्न विचारला की लगेच देशविरोधी असा शिक्का बसतो. पण खरं देशप्रेम म्हणजे अंध भक्ती नाही, तर सत्तेला जाब विचारणं असतं. प्रकाश आंबेडकरांचा सवाल स्पष्ट आहे की, तुम्ही विजयाच्या उंबरठ्यावर होतात, तरीही माघार घेतली. का? आरएसएस आणि मोदी सरकारने याचं उत्तर दिलंच पाहिजे. फक्त जाहिरातीत राष्ट्रप्रथम म्हणून काही होत नाही. रणांगणातही तसंच दाखवावं लागतं.

हा सवाल फक्त प्रकाश आंबेडकरांचा नाही. तो लाखो देशप्रेमी जनतेचा आहे. एकदा मैदानात उतरल्यावर विजय मिळवायचा असतो मागे हटायचं नसतं. देशाला सुरक्षा हवी, पण सोबतच आत्मगौरवही हवा. तो कुठे हरवतोय, हे आता उघडपणे विचारायची वेळ आलीय.


       
Tags: backbjpbrinkfearMaharashtramodiPrakash AmbedkarturnVanchit Bahujan Aaghadivictory
Previous Post

राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 रुग्ण सापडले, एकाचा मृत्यू

Next Post

महाबोधी महाविहार दौऱ्यात राहुल गांधी फक्त फोटो काढायला गेले होते – अॅड. प्रकाश आंबेडकर

Next Post
महाबोधी महाविहार दौऱ्यात राहुल गांधी फक्त फोटो काढायला गेले होते – अॅड. प्रकाश आंबेडकर

महाबोधी महाविहार दौऱ्यात राहुल गांधी फक्त फोटो काढायला गेले होते – अॅड. प्रकाश आंबेडकर

एअर इंडिया विमानमध्ये तांत्रिक बिघाड; हाँगकाँगमध्ये आपत्कालीन लँडिंग
बातमी

Mumbai News : एअर इंडिया विमानमध्ये तांत्रिक बिघाड; हाँगकाँगमध्ये आपत्कालीन लँडिंग

मुंबई : एअर इंडियाच्या विमानांमध्ये सतत घडणाऱ्या तांत्रिक बिघाडांच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत. नुकतीच अहमदाबादच्या विमानात घडलेली घटना ताजी ...

June 16, 2025
Mumbai News : नागरिकांचा संताप! गिरगावमध्ये रस्ता खचला, बेस्ट बस पाच फूट खड्ड्यात
बातमी

Mumbai News : नागरिकांचा संताप! गिरगावमध्ये रस्ता खचला, बेस्ट बस पाच फूट खड्ड्यात अडकली

मुंबई : मुंबईच्या गिरगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली. सिग्नलजवळ मेट्रोचे काम सुरू होते. त्याच ठिकाणी अगदी जवळून जात असताना ...

June 16, 2025
Indrayani Kundmala Bridge Collapse: बाप लेकाचा मृत्यू; फादर्स डे सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते पुण्यातील कुंडमळावर
बातमी

Indrayani Kundmala Bridge Collapse: बाप लेकाचा मृत्यू; फादर्स डे सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते पुण्यातील कुंडमळावर

पुणे : पुण्यातील नदीवरील पूल कोसळल्यामुळे मोठी घटना घडली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मावळ तालुक्यातील कुंडमळा ...

June 16, 2025
अग्निवीर मुरली नाईक यांना शहीदाचा दर्जा द्या, कुटुंबाला एक कोटींची मदत करा: प्रकाश आंबेडकरांची मागणी
बातमी

अग्निवीर मुरली नाईक यांना शहीदाचा दर्जा द्या, कुटुंबाला एक कोटींची मदत करा: प्रकाश आंबेडकरांची मागणी

मुंबई: घाटकोपर येथील रहिवासी असलेले अग्निवीर मुरली नाईक यांना सेवेत असताना वीरमरण आले, मात्र त्यांच्या कुटुंबाला केंद्र किंवा राज्य सरकारकडून ...

June 16, 2025
ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन ; वैष्णवी हागुणे यांनी पटकावला प्रथम क्रमांक
बातमी

ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ; वैष्णवी हागुणे यांनी पटकावला प्रथम क्रमांक

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त १० मे २०२५ रोजी एक भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित ...

June 16, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क