Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

‘वंचित’चा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झाला नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 31, 2024
in राजकीय
0
‘वंचित’चा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झाला नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर
0
SHARES
121
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

अकोला : वंचित बहुजन आघाडीचा अजून महाविकास आघाडीत समावेश झाला नाहीये,असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत केले आहे. नाना पटोले यांना अधिकार आहेत की नाही हे स्पष्ट नसतांना ते पत्रव्यवहार करत आहेत. आम्हाला सांगण्यात आलं होतं की, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण आहेत ते निर्णय घेतील. त्या पत्रावर अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची स्वाक्षरी नाहीये. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

काल झालेल्या बैठकीत त्यांनी काही मुद्दे मांडले एक, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्ताने मराठा आरक्षणाचा मुद्दा, दिल्लीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी एक वर्ष आंदोलन केले आणि तीन काळया कृषी कायद्याला स्थगिती दिली. त्याबाबतची भूमिका महाविकास आघाडीने स्पष्ट करावी, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

२ फेब्रुवारीच्या तारखेच्या बैठकीत आम्ही दिलेला जो अजेंडा आहे तो आणि त्याच्याबरोबर जे तीन घटक पक्ष आहेत काँग्रेस, शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला २ तारखेपर्यंत तयार होईल असे आम्ही मानतो. त्याचा मसुदा आम्हाला दिला, तर संयुक्तरित्या चर्चा करायची की, एक-एक पक्षासोबत चर्चा करायची हा निर्णय त्या बैठकीत होईल.

आम्ही बैठकीत खुलासा केला आहे की, केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही यासाठी आम्ही कोणतेही वैयक्तिक कारण किंवा इतर कारण आड येऊ देणार नाही. काँग्रेसने आम्हाला जे पत्र दिले आहे, त्यावर नाना पटोलेंची स्वाक्षरी आहे. आम्हाला शंका आहे की, नाना पटोले यांना कोणाला सहभागी करून द्यायचे अधिकार दिले आहेत किंवा नाही दिले आहेत याची स्पष्टता आम्ही काँग्रेसला मागत आहोत. नाही, तर नाना पटोले एक करतील आणि काँग्रेस दुसरं काही करेल यात खूप अंतर होईल. असे त्यांनी म्हटले आहे. कारण, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी सांगितले होते की, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांना आघाडीच्या निर्णयाचे अधिकार दिले असल्याचे सांगितले होते. कालची ती सही त्यांची व्यक्तिगत असेल

महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही खुलासा केला आहे की, केंद्रात पुन्हा भाजप सरकार येणार नाही, यासाठी आम्ही कोणतेही वैयक्तिक कारण किंवा इतर कारण आड येऊ देणार नाही. आम्ही अगोदरपासून सांगत आहोत की, हे देशातील भाजपचे सरकार देशाला धोकादायक आहे, म्हणून आम्ही त्यांचा विरोध करतोय. आपला इगो सोडून आरएसएस-भाजपाचे सरकार न येणे यासाठी आमची प्राथमिकता असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.


       
Tags: AkolaCongressmahavikasaghadiNana PatolePrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘मविआ’ चे वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेतल्याचे पत्र !

Next Post

नाना पटोले यांना कोणाला सहभागी करुन घ्यायचे अधिकार आहेत का ? – प्रकाश आंबेडकर

Next Post
नाना पटोले यांना कोणाला सहभागी करुन घ्यायचे अधिकार आहेत का ? – प्रकाश आंबेडकर

नाना पटोले यांना कोणाला सहभागी करुन घ्यायचे अधिकार आहेत का ? - प्रकाश आंबेडकर

मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही – अॅड. प्रकाश आंबेडकर
बातमी

मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही – अॅड. प्रकाश आंबेडकर

पुणे - मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र युद्धानंतर भारताच्या बाजून एकही देश का उभा राहिला नाही याबाबत लोकांनी मोदी,भाजप आणि ...

June 6, 2025
आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 1,827 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला
बातमी

आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 1,827 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला

'लाडकी बहीण'साठी सामाजिक न्याय विभागाला पुन्हा फटका, 410 कोटींचा निधी वळवला मुंबई - सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गत विधानसभा ...

June 6, 2025
फडणवीस सरकारने गुंडाळल्या 903 विकास योजना
बातमी

फडणवीस सरकारने गुंडाळल्या 903 विकास योजना

मुंबई- राज्यातील तब्बल 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. ...

June 6, 2025
शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगडावर लाखो शिवभक्त दाखल
Uncategorized

शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगडावर लाखो शिवभक्त दाखल

रायगड - रायगडावर आज छत्रपती शिवाजी महारांचा 352वा राज्याभिषेक सोहळा साजरा गेला जात आहे. यासाठी लोखो शिवभक्तांची अलोट गर्दी किल्ले ...

June 6, 2025
देशात जातीय जनगणना सुरु होणार, तारीख जाहीर
Uncategorized

देशात जातीय जनगणना सुरु होणार, तारीख जाहीर

पुणे - देशात जातीय जनगणना सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जातीय जनगणना १ मार्च २०२७ पासून सुरू होणार ...

June 6, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क