लासुर : “सत्ताधाऱ्यांनी आजवर केवळ आश्वासनांची खैरात केली, पण शेतकरी आणि वंचितांचे प्रश्न आजही कायम आहेत. आता केवळ आश्वासनं नको, तर हक्काचा विकास हवा असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा,” असे जोरदार आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. (Sujat ambedkar)
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यात लासुर येथे आयोजित भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सभेला उपस्थित असलेल्या जनसमुदायाने दिलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. यावेळी सभेसाठी नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली.

सुजात आंबेडकर यांनी मांडलेली सभेतील प्रमुख मुद्दे:
– रस्ते, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे हेच पक्षाचे मुख्य ध्येय.
– शेतमालाला हमीभाव आणि पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या पदरात पाडण्यासाठी ‘वंचित’ कटिबद्ध.
– स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचितांचे प्रतिनिधी गेल्याशिवाय गावांचा सर्वांगीण विकास शक्य नाही.
– प्रस्थापित पक्षांनी कष्टकरी आणि महिलांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
वंचित बहुजन आघाडी हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित पक्ष नसून, तो प्रत्यक्षात काम करणारा विचार आहे. असे सुजात आंबेडकर म्हणाले. (Sujat ambedkar)

या सभेला राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भुईगळ, जावेद कुरैशी, औरंगाबाद पश्चिम जिल्हा कार्याध्यक्ष अंजन साळवे यांच्यासह पक्षाचे अनेक स्थानिक पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.





