बीड : पाटोदा तालुक्यातील विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाटोदा येथे हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष अजय सरोदे यांनी केले. या मोर्चात तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम वीर, सचिन मेघडंबर, भारत तांगडे, अंकुश जाधव, शिरूर तालुका अध्यक्ष दिलीप माने, तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या यशस्वी मोर्चाच्या आयोजनाबद्दल पाटोदा तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांचे अभिनंदन करण्यात आले. या मोर्चाद्वारे वंचित बहुजन आघाडीने पाटोदा तालुक्यातील जनतेच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...
Read moreDetails