सोलापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 वाजेनंतर झालेल्या आश्चर्यकारक 76 लाख मतांच्या वाढीविरोधात, तसेच अनुसूचित जाती-जमातींच्या पळवलेल्या निधी विरोधात “जन आक्रोश मोर्चा” सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
या आंदोलनात सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य अमोल लांडगे यांनी केले आहे. या मोर्चात सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती असणार असून, हा मोर्चा लोकशाहीवरील वाढत्या आघातांविरोधात जनतेचा आवाज ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेली मोठी मतदानवाढ, ईव्हीएम व पारदर्शकतेविषयी असलेले प्रश्न आणि संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी हा लढा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश
मुंबई : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्य सरकारला या निवडणुका घेण्यासाठी...
Read moreDetails