Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

त्यांना केवळ बहुजनांची मते हवी आहेत!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 8, 2024
in राजकीय
0
त्यांना केवळ बहुजनांची मते हवी आहेत!
       

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडीवर निशाणा

मुंबई : त्यांना केवळ बहुजनांची मते हवी होती आणखी काही नाही. INDIA आघाडीला संसदेमध्ये स्वतंत्र बहुजनांचे नेतृत्वच नको होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा वापर केला आणि आमचे तत्वज्ञान हायजॅक केले, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

हे तेच पक्ष आहेत, ज्यांनी सर्वांत आधी राज्यघटनेची पायमल्ली केली आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 1 आणि 2 जेव्हा संविधानात सुधारणा करत होते, तेव्हा यांनी त्यावर मौन बाळगले होते आणि मवाळ हिंदुत्वाचे पांघरुन घेतले होते. या पक्षांना बहुजनांच्या मतांचा वापर करून आपला वाडा वाचवायचा होता आणि तो नव्याने बांधायचा होता आणि ते त्यांनी केले असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

ॲड. आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, या निवडणूक प्रक्रियेत, बहुजनांनी स्वत:चे स्वतंत्र राजकीय नेतृत्व उभे करण्याची आणि त्यांना संसदेत पाठवण्याची संधी गमावली आहे. आमचा लढा नेहमीच संविधान वाचविण्यासाठी राहिला आहे. किंबहुना हेच आमचे तत्वज्ञान आणि विचारधारा आहे.

बहुजन मतदारांना हे किती वेळा मूर्ख बनवणार? खरंच यांनी बहुजन मतदारांना मूर्ख बनवून धोका दिला नाही का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

जर या पक्षांना संविधान वाचवायचे असते, सामाजिकदृष्ट्या वंचित आणि शोषितांसाठी लढायचे असते, तर वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याची गरजच पडली नसती. तसेच, बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल कास्ट फेडरेशन किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापनाच केली नसती, असे त्यांनी म्हटले आहे.

आमच्या ताकदीचा स्त्रोत जय फुले, जय सावित्री, जय शाहू, जय भीम आहे. वंचितांच्या न्याय हक्काचा आणि संविधान रक्षणाचा आमचा लढा सुरूच राहणार आहे. आगामी काळात आम्ही मोठ्या ताकदीने आणि विश्वासाने जनतेच्या पाठिंब्यावर भरारी घेऊ, पुनरागमन करू, असा विश्वास त्यांनी या ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.


       
Tags: CongressindiamahavikasaghadiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आंबेडकरी विचारांशी प्रमाणिक राहूया, लढाई अजून संपलेली नाही..!

Next Post

भोसरी विधानसभा मतदार संघातशेकडो तरुणांचा वंचितमध्ये प्रवेश

Next Post
भोसरी विधानसभा मतदार संघातशेकडो तरुणांचा वंचितमध्ये प्रवेश

भोसरी विधानसभा मतदार संघातशेकडो तरुणांचा वंचितमध्ये प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मराठा आरक्षण चळवळ : सामाजिक मागासपणा की राजकीय दबाव?
article

मराठा आरक्षण चळवळ : सामाजिक मागासपणा की राजकीय दबाव?

by Akash Shelar
August 28, 2025
0

लेखक : आज्ञा भारतीय भारतीय समाजरचनेत आरक्षण ही व्यवस्था संविधानाच्या चौकटीतून निर्माण झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण ही सामाजिक...

Read moreDetails
अकोट तालुका मुंडगाव जि.प. सर्कल बैठक उत्साहात संपन्न; ‘बालेकिल्ला कायम ठेवू’ – कार्यकर्त्यांचा निर्धार

अकोट तालुका मुंडगाव जि.प. सर्कल बैठक उत्साहात संपन्न; ‘बालेकिल्ला कायम ठेवू’ – कार्यकर्त्यांचा निर्धार

August 28, 2025
वंचित बहुजन आघाडीतर्फे साकोलीच्या शारदा चौकात वृक्षारोपण

वंचित बहुजन आघाडीतर्फे साकोलीच्या शारदा चौकात वृक्षारोपण

August 28, 2025

कोल्हापूर: विशालगड हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार रवी पडवळ अखेर १३ महिन्यांनंतर अटक

August 28, 2025
वडोदा जिल्हा परिषद सर्कल कार्यकारिणीसाठी मुलाखत संपन्न!

वडोदा जिल्हा परिषद सर्कल कार्यकारिणीसाठी मुलाखत संपन्न!

August 28, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home