Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

ख्रिस्ती समाजालाही निवडणुकांत प्रतिनिधित्व मिळावे !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 6, 2024
in राजकीय
0
ख्रिस्ती समाजालाही निवडणुकांत प्रतिनिधित्व मिळावे !
       

ख्रिस्ती शिष्टमंडळाची प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट !

पुणे : वर्षानुवर्षे ख्रिस्ती समाज राजकीयदृष्ट्या उपेक्षित राहीला असून आता अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी ख्रिस्ती समाजाला लोकसभा आणि विधानसभेत महत्त्वाचा वाटा द्यावा अशी आग्रही मागणी रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत केदारी यांनी वंचित आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांना केली.ख्रिस्ती समाजाच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुंबई येथे राजगृहावर आंबेडकर यांची भेट घेतली.

ख्रिस्ती समाजाची राजकीय व सामाजिक भूमिका घेण्यासाठी वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर निर्णायक व सकारात्मक चर्चा राजगृह दादर मुंबई येथे झाली. रिजनल ख्रिश्चन सोसायटीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली राजकीय भूमिका घ्यावयाच्या संदर्भात तसेच राजकीय प्रतिनिधित्व यासंदर्भात समाजाच्या मूलभूत प्रश्नांच्या संदर्भात व होत असलेल्या अन्यायाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

ख्रिस्ती समाजाचे नेते प्रशांत (लुकस) केदारी यांनी आंबेडकर यांच्याशी बोलताना सद्य समाजाची परिस्थितीत येणाऱ्या लोकसभा,विधानसभा,स्थानिक स्वराज्य इ.प्रतिनिधित्व मिळावे.ख्रिस्ती समाजाच्या अनेक अडचणी आहेत, ख्रिस्ती समाजांच्या चर्चेस,धर्मगुरू-पास्टर यांचे हल्ल्यापासून संरक्षण, अनुसूचित जातीतून धर्मातरीत खिश्चनाना आरक्षण इत्यादी विषयावर प्रदीर्घ चर्चा झाली.

प्रमोद पारधे यांनी वडगावशेरी विधानसभेची विस्तृत माहित बाळासाहेब यांना दिली आणि कसे विधानसभेत यश प्राप्त करू शकतो याचे विश्लेषण केले. बैठक वंचित बहुजन आघाडीचे किरण गायकवाड यांच्या द्वारे झाली. सोन्याबापू वाघमारे यांनी प्रशांत केदारी हे भक्कम नेतृत्व आहे त्यांना सर्वांचे पाठबळ आहे. समविचारांची साथ व संधी मिळाल्यास ते विधानसभेत समाजाच्या वतीने नेतृत्व करण्यास पात्र आहेत.

ॲड.अंतोन कदम यांनी ४०-४१लाख महाराष्ट्रात जनसंख्याचा विखूरलेला व प्रादेशिक भाषेत विभागलेला समाजाचे नेत्रृत्व नाही अशी खंत व्यक्त केली. आम्ही इतिहास करू त्यासाठी आम्हाला संधी द्या असे त्यांनी सांगितले.

पीटर डिसुझा यांनी समाजाच्या स्थिती बद्दल भावना व्यक्त केल्या. प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जाणून घेवून खिस्ती समाजाचे योगदान आहे पण केवळ चर्च कंपाऊंड मधून तुम्हाला नेतृत्व कसे मिळेल. तुम्हाला मुख्य प्रवाहात येवून जनजागृती करावी लागेल. तुमचे सगळे सेवास्त्रोत जमेस धरून त्यांची मोठ बाधावी लागेल. तळागाळातील लोकांना समता व मानवतेच्या विचारधारेला जोडावे लागेल. तुम्ही समाजकरणात येत आहात याचा आनंद वाटतो. भविष्यात आपण एकत्रितपणे काम करु असे त्यांनी सांगितले.

जॉर्ज रॉड्रिग्स यांनी बाळासाहेबांचे आभार मानले. याबरोबरच शिष्टमंडळात मार्कस पंडित ,रवींद्र कांबळे,प्रतिमा केदारी ,मेरी पारगे ,सलोमी तोरणे, तेरेसा केदारी, ऍंथोनी कर्डक,जॉन रूपवते,रतन ब्राह्मणे,जॉन केडर, सुभाष केदारी , छगन धीवर यासह राज्यभरातील ख्रिस्ती समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


       
Tags: ChristianPrakash AmbedkarpuneVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

जाफराबाद येथे एक दिवशीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर संपन्न !

Next Post

सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राहायला हवे : ॲड. आंबेडकर

Next Post
सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राहायला हवे : ॲड. आंबेडकर

सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राहायला हवे : ॲड. आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
"वंचित समाजाने आता एकत्र यावे लागेल, नाहीतर भविष्यात कोणी वाली राहणार नाही" अंजलीताई आंबेडकर यांचा इशारा
बातमी

“वंचित समाजाने आता एकत्र यावे लागेल, नाहीतर भविष्यात कोणी वाली राहणार नाही” अंजलीताई आंबेडकर यांचा इशारा

by Tanvi Gurav
July 18, 2025
0

वाशिम - "येणारा काळ वंचित घटकांसाठी अत्यंत गंभीर असून, आता सर्व वंचित समाजाने एकत्र न आल्यास भविष्यात त्यांच्या पाठीशी कोणी...

Read moreDetails
गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध "खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!"

गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध”खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!”

July 17, 2025
UAPA विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

UAPA विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

July 17, 2025
सानपाडा येथील बस स्थानकासमोर कित्येक महिन्यांपासून उघड्यावर असलेला धोकादायक चेंबर अखेर झाकण्यात आला आहे. या खुल्या चेंबरमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला होता. वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई आणि पत्रकार विष्णू बुरे, सचिन पुटगे व रंजित तायडे यांनी या समस्येकडे लक्ष वेधत एक वेगळी पद्धत अवलंबली. त्यांनी चेंबरच्या ठिकाणी अनोख्या पद्धतीने पूजा करून प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाची दखल घेत संबंधित विभागाने तत्काळ कारवाई करत काल रात्री चेंबरवर झाकण बसवले. या सकारात्मक निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, वंचित बहुजन आघाडी व सजग पत्रकारांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संबंधित विभागाचे मनःपूर्वक आभार तसेच जागरूक पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सानपाड्यातील धोकादायक चेंबरला झाकण बसवले; वंचित बहुजन आघाडी व पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश

July 17, 2025
कोनाळीत बाबासाहेबांच्या झेंड्याचा अपमान; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा

कोनाळीत बाबासाहेबांच्या झेंड्याचा अपमान; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा

July 17, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home