Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

फुले आंबेडकर विद्वत सभेची विभागीय स्तरीय समन्वयकांची चिंतन बैठक.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 13, 2024
in बातमी
0
फुले आंबेडकर विद्वत सभेची विभागीय स्तरीय समन्वयकांची चिंतन बैठक.
       

ळगाव : फुले आंबेडकर विद्वत सभेचे मुख्य मार्गदर्शक भास्कर भोजने यांनी विभागीय समन्वयकांची एक दिवशीय बैठकीचे आयोजन व्हावे अशा प्रकारची सूचना या ग्रुपवर आठ दिवसांपूर्वी केली होती. त्याला प्रतिसाद म्हणून राज्य समन्वयक प्रा.डॉक्टर विनोद उपर्वट यांच्या नेतृत्वाखाली प्रा. डॉक्टर सत्यजित साळवे यांनी “रिच पॅलेस” जळगाव येथे बैठकीचे आयोजन केले. ही बैठक फुले आंबेडकर विद्वत सभेचे मुख्य मार्गदर्शक भास्कर भोजने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व विभागीय समन्वयकांनी आपापल्या क्षेत्रात करीत ससलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. त्यावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली आणि विद्वत सभेच्या कार्याची गती धीमी असली तरी ती सकारात्मक कार्यशील आहे असे मत सर्वांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात विशेषतः कोंकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व खानदेश विभागात फुले आंबेडकर सभेचे कार्य गतिशील नाही याचीही खंत व्यक्त करण्यात आली. तरीही राज्य समन्वयक प्रा. डॉक्टर मनोज निकाळजे सकारात्मकतेने या उर्वरित विभागात कार्य होईल असे मत नोंदविले.

बाळासाहेब आंबेडकरांनी राजकीय स्तरावर सुचविलेल्या 39 मुद्द्यांवर साधक बाधक चर्चा होऊन फुले आंबेडकर विद्वत सभेच्या वतीने विस्तारित पुस्तिका आठ ते बारा दिवसांमध्ये काढावी असेही ठरले. त्याकरिता ज्या ज्या समन्वयकांना शक्य असेल त्यांनी अभिप्रेत मुद्द्यांवर दोन ते तीन पानाचे विस्तृत लेखन करून ते राज्य समन्वयक प्रा. डॉक्टर मनोज निकाळजे सरांकडे द्यावे असेही ठरविण्यात आले.

प्रा. डॉ.सत्यजित साळवे (खानदेश) आणि प्रा. डॉक्टर पूनम एसांबरे (पूर्व विदर्भ) यांना विभागीय समन्वयक म्हणून उपस्थितांच्या संमतीने सन्माननीय भास्कर भोजने यांनी नियुक्त केले.या यावेळी दोन्हीही नवनिर्वाचित विभागीय समन्वयकांनी आम्ही विद्वत सभेच्या वाढीस अत्यंत कार्यक्षमतेने कार्य करीत आणि उपस्थित त्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वासास पात्र ठरू व बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताईंचे नेतृत्व मान्य करून कार्य करू असे उपस्थितांचे आभार मानून स्पष्ट केले.

महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकीत फुले आंबेडकर विद्वत सभेच्या सर्वच विद्वतांनी गतिशील व वैचारिकतेने कार्य करावे असेही ठरावाद्वारे सूचित केले. त्याकरिता समन्वयकांनी आपापल्या क्षेत्रात कमीत कमी दहा व त्यापेक्षा जास्त समन्वयक तयार करावेत जेणेकरून वंचित बहुजन आघाडीला पूरक कार्य करणारे कार्यकर्ते मिळू शकतील असा आशावाद व्यक्त केला, तसेच विभागीय समन्वयकांनी आपापल्या क्षेत्रात दोन ते तीन प्रशिक्षण वर्ग घेऊन समन्वयकांना अधिक कार्यरत करावे असेही ठरविण्यात आले.

या चिंतन बैठकीस विभागीय समन्वयक प्राचार्य डॉक्टर विठ्ठल खाडे,(वाशिम) प्रा. डॉक्टर रमेश इंगोले (बुलढाण प्रा. डॉक्टर केशव मेंढे (नागपूर) प्रा. डॉक्टर जगदीश जाधव (रत्नागिरी) प्रा. डॉक्टर माधव पुणेकर (पुणे) सन्माननीय सिद्धार्थ देवदरीकर (अकोला) प्रा.डॉक्टर पूनम एसांबरे (वर्धा) आयोजक प्रा.डॉक्टर सत्यजित साळवे (जळगाव) राज्य समन्वयक प्रा. डॉक्टर विनोद उपर्वट, राज्य समन्वयक प्रा. डॉक्टर मनोज निकाळजे, मुख्य मार्गदर्शक भास्कर भोजने आणि बैठकीस विशेष सहकार्य करणारे प्रा. डॉक्टर प्रमोद भुंबे व प्रा. डॉक्टर सरदार (द्वय जळगाव) आयु. भाऊराव सोनोने (अकोला) उपस्थित होते.


       
Tags: Anjalitai AmbedkarbhaskarbhojanePrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘हिम्मतवाले’ प्रकाश आंबेडकर!

Next Post

बाळासाहेबांच्या लढ्याला चिमुकलीची साथ

Next Post
बाळासाहेबांच्या लढ्याला चिमुकलीची साथ

बाळासाहेबांच्या लढ्याला चिमुकलीची साथ

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‎देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
बातमी

‎देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

by mosami kewat
July 22, 2025
0

‎मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे...

Read moreDetails
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत; अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत; अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान

July 22, 2025
नालासोपारा जवळच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर आढळला; तपास सुरू

नालासोपारा जवळच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर आढळला; तपास सुरू

July 22, 2025
'रमी' प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; कृषिमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा- वंचितची मागणी

‘रमी’ प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; कृषिमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा- वंचितची मागणी

July 22, 2025
प्रवाशांसाठी खुशखबर! आता 'भारत गौरव यात्रा' रेल्वे प्रवासाचं स्वप्न EMI वर करा पूर्ण

प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘भारत गौरव यात्रा’ रेल्वे प्रवासाचं स्वप्न EMI वर करा पूर्ण

July 22, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home