Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‎विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींचा विरोध करत नाहीत – ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका

mosami kewat by mosami kewat
August 7, 2025
in बातमी
0
‎विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींचा विरोध करत नाहीत - ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका

‎विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींचा विरोध करत नाहीत - ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका

       


‎शरद पवार तर भाजपचे हस्तकच – ॲड. प्रकाश आंबेडकर
‎
‎मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आगामी निवडणुकीत मोदींच्या पक्षाला सत्तेतून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. विरोधकांना ‘लकवा मारला’ असल्याचा आरोप करत आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावरही भाजपचे ‘हस्तक’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
‎
‎मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
‎
‎पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सध्या देश एका व्यक्तीमुळे अडचणीत सापडला आहे. जागतिक स्तरावर भारताला घेरण्याचे प्रयत्न सुरू असताना, ‘व्यक्ती की देश’ असा प्रश्न उभा राहिला आहे. हे सर्व केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळे होत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. देशाला या परिस्थितीतून बाहेर काढायचे असेल तर मोदींच्या पक्षाला पुन्हा सत्तेवर येऊ देऊ नये. जर तुम्ही त्यांना बळी पडलात, तर देशाला बळी द्याल, असा इशाराही त्यांनी दिला. देशातील मतदार याबाबत शहाणपणाने निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‎
‎’१४० कोटींमधून कोणीतरी पुढे येईल’
‎
‎देशाला पर्याय कोण असेल, यावर विचार करू नका, असे सांगत आंबेडकर म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षापासून देशाला वाचवणे हेच सध्या महत्त्वाचे आहे. १४० कोटींच्या या देशात कोणीतरी निश्चितच पुढे येऊन नेतृत्व करू शकतो, यावर विश्वास ठेवा. नरेंद्र मोदी यांनी निवृत्त झाल्यास देशाला घेरण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, ते थांबतील, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
‎
‎शरद पवार भाजपचे ‘हस्तक’ असल्याचा आरोप
‎’इंडिया’ आघाडी आणि ‘महाविकास आघाडी’च्या दिल्लीतील बैठका झाल्या असल्या, तरी शरद पवार यांच्यावर आंबेडकर यांनी गंभीर आरोप केले. शरद पवार हे भाजपचे हस्तक असून ते त्यातून कधीच बाहेर पडू शकणार नाहीत. देशाच्या राजकारणात घडामोडी करणारे लोक वेगळे आहेत आणि तुमच्या समोर दिसणारे लोक वेगळे आहेत.
‎
‎राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यात मोदींना आव्हान देण्याची हिंमत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींना विरोध करू शकत नाहीत, असे ते म्हणाले. १५ दिवसांत देशाच्या राजकारणात एक नवीन बातमी कळेल, असा मोठा दावाही त्यांनी केला.
‎
‎ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर भूमिका
‎
‎यावेळी त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली. व्हीव्हीपॅट नसेल तर निवडणुकीत सहभागी होणार नाही, असे विरोधकांनी जाहीर करावे. व्हीव्हीपॅट असेल तरच निवडणुकीत सामील व्हा, अन्यथा बॅलेट पेपरचा वापर करण्याची मागणी करा. या सगळ्या घडामोडींमध्ये विरोधक कुठेही दिसत नाहीत आणि त्यांना कोणीही विचारत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
‎


       
Tags: bjpCongressPrakash AmbedkarSharad Pawar
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकर पंढरपूर कोर्टात हजर, वकिलांशी साधला संवाद

Next Post

यशोदा नगर रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Next Post
यशोदा नगर रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

यशोदा नगर रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
…ते ‘वंचित’ने करून दाखवले! प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसलाही सल्ला
बातमी

…ते ‘वंचित’ने करून दाखवले! प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसलाही सल्ला

by mosami kewat
March 3, 2026
0

पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या तालावर मुजरा करतायत : प्रकाश आंबेडकर मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी...

Read moreDetails
अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

March 2, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा – सुजात आंबेडकर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा – सुजात आंबेडकर 

March 2, 2026
‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’

‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’

March 2, 2026
Mumbai Pollution : मुंबईत पुन्हा वाढता प्रदूषणाचा धोका; पवईत सर्वाधिक एक्यूआय

Mumbai Pollution : मुंबईत पुन्हा वाढता प्रदूषणाचा धोका; पवईत सर्वाधिक एक्यूआय

March 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home