Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित युवा आघाडीने घेराव घालण्याच्या इशारा देताच महाज्योती कडून तातडीने १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्ती मंजूर – राजेंद्र पातोडे.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 28, 2023
in बातमी, राजकीय
0
महाज्योती कडून १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची सहा महिने पासून अडवणूक – राजेंद्र पातोडे.
       

नागपूर, दि. २८ – महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) कडून १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची सहा महिने पासून अधिछात्रवृत्तीसाठी अडवणूक करण्यात येत असून ३० एप्रिल पर्यंत अधिछात्रवृत्ती न दिल्यास वंचित युवा आघाडी महाज्योती कार्यालयास
घेराव घालणार असल्याचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीने दिला होता त्यावर आज मंत्री अतुल सावे आणि संचालक मंडळाने तातडीने बैठक घेऊन १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्ती मंजूर केली असून पंधरा दिवसांत विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचा निरोप बार्टी प्रकल्प व्यवस्थापक ह्यांनी दिला असून घेराव घालू नका असा आर्जव करण्यात आल्याची माहिती प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी दिली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) १२२६ ओबीसी संशोधक विद्यार्थीना अधिछात्रवृत्ती मंजूर होऊन सहा महिने उलटले असले तरी एकाही विद्यार्थ्यांस त्याचा लाभ मिळालेला नव्हता.शासना कडून व संचालक मंडळा कडून ओबीसी विद्यार्थ्यांच्या संशोधनामध्ये आडकाठी आणली जात असल्याने महाज्योती कडून १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची सहा महिने पासून अडवणूक होत असून ३० एप्रिल पर्यंत अधिछात्रवृत्ती न दिल्यास वंचित युवा आघाडी कडून घेराव घालुन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देताच आज संचालक मंडळ खडबडून जागे झाले आणि आजच्या बैठकीत अधिछात्रवृत्ती मंजूर करण्यात आली.ह्या बैठकीत इतर मागासवर्गीय बहूजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, इतर मागासवर्गीय बहूजन कल्याण विभागाचे संचालक दिनेश ढोके आणि महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले व अधिकारी आणि संभाजी नगर मधून आलेले काही विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.त्यांनी तातडीने अधिछात्रवृत्ती मंजूर करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे गेली सहा महिने अधिछात्रवृत्ती मंजूरीची प्रतीक्षा करणारे १२२६ ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे.
संचालक मंडळाने हा निर्णय घेतला असून १५ दिवसात विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती दिली जाणार असल्याने ३० एप्रिल २०२३ वंचित बहूजन युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष डॉ निलेश विश्वकर्मा आणि महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांचे नेतृत्वाखाली १२२६ ओबीसी संशोधक विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाज्योती कार्यालयास घेराव घालण्याचे आंदोलन करू नये अशी विनंती महाज्योती चे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल सिरसाठे ह्यांनी ह्या 9767599934 मोबाईल क्रमांकावरून केली.
‘महाज्योती’च्या वतीने इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांचा अधिछात्रवृत्ती प्रश्न मार्गी लागल्याने वंचित युवा आघाडी ने ३० तारखेचे प्रस्तावित ‘घेराव आंदोलन’ स्थगित केले आहे.

राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101


       
Tags: FELLOWSHIPMahajyotiobcVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

महाज्योती कडून १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची सहा महिने पासून अडवणूक – राजेंद्र पातोडे.

Next Post

शैक्षणिक धोरण २०२० मनुवादी समाज व्यवस्थेकडे वाटचाल

Next Post
शैक्षणिक धोरण २०२० मनुवादी समाज व्यवस्थेकडे वाटचाल

शैक्षणिक धोरण २०२० मनुवादी समाज व्यवस्थेकडे वाटचाल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र प्रदेश संघटात्मक निवडणूक २०२६ उत्साहात पार
बातमी

वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र प्रदेश संघटात्मक निवडणूक २०२६ उत्साहात पार

by mosami kewat
July 30, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटात्मक निवडणूक २०२६ आज, गुरुवार (३० जुलै) रोजी लोकशाही पद्धतीने उत्साहात पार पडली....

Read moreDetails
औरंगाबाद मनपा सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी

औरंगाबाद मनपा प्रभाग सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी

July 30, 2026
देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

July 29, 2026
शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

July 29, 2026
मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

July 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home