Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित युवा आघाडीने घेराव घालण्याच्या इशारा देताच महाज्योती कडून तातडीने १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्ती मंजूर – राजेंद्र पातोडे.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 28, 2023
in बातमी, राजकीय
0
महाज्योती कडून १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची सहा महिने पासून अडवणूक – राजेंद्र पातोडे.
       

नागपूर, दि. २८ – महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) कडून १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची सहा महिने पासून अधिछात्रवृत्तीसाठी अडवणूक करण्यात येत असून ३० एप्रिल पर्यंत अधिछात्रवृत्ती न दिल्यास वंचित युवा आघाडी महाज्योती कार्यालयास
घेराव घालणार असल्याचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीने दिला होता त्यावर आज मंत्री अतुल सावे आणि संचालक मंडळाने तातडीने बैठक घेऊन १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्ती मंजूर केली असून पंधरा दिवसांत विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचा निरोप बार्टी प्रकल्प व्यवस्थापक ह्यांनी दिला असून घेराव घालू नका असा आर्जव करण्यात आल्याची माहिती प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी दिली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) १२२६ ओबीसी संशोधक विद्यार्थीना अधिछात्रवृत्ती मंजूर होऊन सहा महिने उलटले असले तरी एकाही विद्यार्थ्यांस त्याचा लाभ मिळालेला नव्हता.शासना कडून व संचालक मंडळा कडून ओबीसी विद्यार्थ्यांच्या संशोधनामध्ये आडकाठी आणली जात असल्याने महाज्योती कडून १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची सहा महिने पासून अडवणूक होत असून ३० एप्रिल पर्यंत अधिछात्रवृत्ती न दिल्यास वंचित युवा आघाडी कडून घेराव घालुन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देताच आज संचालक मंडळ खडबडून जागे झाले आणि आजच्या बैठकीत अधिछात्रवृत्ती मंजूर करण्यात आली.ह्या बैठकीत इतर मागासवर्गीय बहूजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, इतर मागासवर्गीय बहूजन कल्याण विभागाचे संचालक दिनेश ढोके आणि महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले व अधिकारी आणि संभाजी नगर मधून आलेले काही विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.त्यांनी तातडीने अधिछात्रवृत्ती मंजूर करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे गेली सहा महिने अधिछात्रवृत्ती मंजूरीची प्रतीक्षा करणारे १२२६ ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे.
संचालक मंडळाने हा निर्णय घेतला असून १५ दिवसात विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती दिली जाणार असल्याने ३० एप्रिल २०२३ वंचित बहूजन युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष डॉ निलेश विश्वकर्मा आणि महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांचे नेतृत्वाखाली १२२६ ओबीसी संशोधक विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाज्योती कार्यालयास घेराव घालण्याचे आंदोलन करू नये अशी विनंती महाज्योती चे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल सिरसाठे ह्यांनी ह्या 9767599934 मोबाईल क्रमांकावरून केली.
‘महाज्योती’च्या वतीने इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांचा अधिछात्रवृत्ती प्रश्न मार्गी लागल्याने वंचित युवा आघाडी ने ३० तारखेचे प्रस्तावित ‘घेराव आंदोलन’ स्थगित केले आहे.

राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101


       
Tags: FELLOWSHIPMahajyotiobcVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

महाज्योती कडून १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची सहा महिने पासून अडवणूक – राजेंद्र पातोडे.

Next Post

शैक्षणिक धोरण २०२० मनुवादी समाज व्यवस्थेकडे वाटचाल

Next Post
शैक्षणिक धोरण २०२० मनुवादी समाज व्यवस्थेकडे वाटचाल

शैक्षणिक धोरण २०२० मनुवादी समाज व्यवस्थेकडे वाटचाल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
तिवसा येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून पोलिसांना राखी बांधून कर्तव्याची जाणीव
बातमी

तिवसा येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून पोलिसांना राखी बांधून कर्तव्याची जाणीव

by mosami kewat
August 13, 2025
0

अमरावती : राज्यात महिला आणि तरुणींना योग्य न्याय मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन महिला आघाडीने पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी...

Read moreDetails
रक्षाबंधनाचा सण केवळ बहिण-भावाच्या प्रेमापुरता मर्यादित न ठेवता, समाजाला एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीने अनोखा उपक्रम राबवला.

पोलिसांना कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीकडून राख्या

August 13, 2025
मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या मागणीनंतर पालिका प्रशासन कराराचा पुनर्विचार करणार - प्रकाश आंबेडकर

मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या मागणीनंतर पालिका प्रशासन कराराचा पुनर्विचार करणार – प्रकाश आंबेडकर

August 12, 2025
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना

August 12, 2025
'काही चुका होणं स्वाभाविक' जिवंत लोकांना मृत दाखवल्याच्या दाव्यावर सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

‘काही चुका होणं स्वाभाविक’ जिवंत लोकांना मृत दाखवल्याच्या दाव्यावर सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

August 12, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home