Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Mumbai : प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकाराने ३२४ प्रकल्पग्रस्त कुटुंबांना नोकऱ्या नाकारल्याचा प्रश्न मार्गी!

mosami kewat by mosami kewat
June 25, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकाराने ३२४ प्रकल्पग्रस्त कुटुंबांना नोकऱ्या नाकारल्याचा प्रश्न मार्गी!

प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकाराने ३२४ प्रकल्पग्रस्त कुटुंबांना नोकऱ्या नाकारल्याचा प्रश्न मार्गी!

       

अन्यथा राज्य शासन रिलायन्स इंडस्ट्रीजवर कारवाई करणार!

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रायगड जिल्ह्यातील नागोठाणे येथील प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या एकूण ३२४ प्रकल्पग्रस्त व्यक्तींना नोकऱ्या नाकारल्याचा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या ठाम नेतृत्वामुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे आज राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. (Mumbai)

या बैठकीत नागोठाणे येथील आय.पी.सी.एल. (सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज) प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या मागण्या मांडण्यात आल्या. प्रकाश आंबेडकर,संदेश मोरे आणि हितेंद्र गांधी यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिलं की, प्रशासनाने एकूण १,२३७ प्राधान्य प्रमाणपत्रे जारी केली होती, परंतु त्यापैकी केवळ ६९० व्यक्तींनाच नोकऱ्या मिळाल्या आहेत. उर्वरित ३२४ पात्र प्रमाणपत्रधारकांना आजतागायत नोकरी मिळालेली नाही, जे २६ एप्रिल १९८६ व २५ एप्रिल १९९० रोजी झालेल्या अधिकृत बैठकीतील आश्वासनांचे उल्लंघन आहे. (Mumbai)

या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना ७ दिवसांत ३२४ पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करून ती रिलायन्स इंडस्ट्रीजकडे सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच या व्यक्तींना तातडीने नोकऱ्या देण्याचे आदेशही दिले. जर रिलायन्सने यामध्ये सहकार्य केले नाही, तर शासनाकडून कठोर कारवाई केली जाईल, त्यात कंपनीचे प्रकल्प सील करणे किंवा बंद पाडणे यासारख्या उपायांचा समावेश असणार आहे.(Mumbai)

या लढ्याला भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गंगाराम माया मिंमिने आणि वंचित बहुजन माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सचिव सुरेश गणपत मोहिते यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे.आजचा निर्णय हा विकासासाठी आपली जमीन देणाऱ्या कुटुंबांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या दृढ नेतृत्वामुळे या कुटुंबांच्या मागण्या राज्य शासनाच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत आणि नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी भावना प्रकल्पग्रस्त नागरिकांनी व्यक्त केल्या आणि प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले.


       
Tags: issueJobsmumbaiPrakash Ambedkarresolves
Previous Post

भूमिहीन हक्क संरक्षण समितीची पुढील ऐतिहासिक भूमिका व दिशा ठरविणारे शिबीर

Next Post

Pimpri Chinchwad : धक्कादायक! पत्नीला आणि प्रियकराला एकत्र पाहून पतीकडून हत्या

Next Post
Pimpri Chinchwad : धक्कादायक! पत्नीला आणि प्रियकराला एकत्र पाहून पतीकडून हत्या

Pimpri Chinchwad : धक्कादायक! पत्नीला आणि प्रियकराला एकत्र पाहून पतीकडून हत्या

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध "खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!"
बातमी

गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध”खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!”

by Tanvi Gurav
July 17, 2025
0

गोवंडीतील खड्डेमय रस्त्यांवर व नाल्यांच्या दुर्दशेवर वंचित बहुजन महिला आघाडीचे तीव्र आंदोलन; महापालिकेला इशारा "खड्डे बुजवा नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात घाला!"...

Read moreDetails
UAPA विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

UAPA विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

July 17, 2025
सानपाडा येथील बस स्थानकासमोर कित्येक महिन्यांपासून उघड्यावर असलेला धोकादायक चेंबर अखेर झाकण्यात आला आहे. या खुल्या चेंबरमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला होता. वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई आणि पत्रकार विष्णू बुरे, सचिन पुटगे व रंजित तायडे यांनी या समस्येकडे लक्ष वेधत एक वेगळी पद्धत अवलंबली. त्यांनी चेंबरच्या ठिकाणी अनोख्या पद्धतीने पूजा करून प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाची दखल घेत संबंधित विभागाने तत्काळ कारवाई करत काल रात्री चेंबरवर झाकण बसवले. या सकारात्मक निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, वंचित बहुजन आघाडी व सजग पत्रकारांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संबंधित विभागाचे मनःपूर्वक आभार तसेच जागरूक पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सानपाड्यातील धोकादायक चेंबरला झाकण बसवले; वंचित बहुजन आघाडी व पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश

July 17, 2025
कोनाळीत बाबासाहेबांच्या झेंड्याचा अपमान; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा

कोनाळीत बाबासाहेबांच्या झेंड्याचा अपमान; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा

July 17, 2025
सोलापूर : अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागणी

सोलापूर : अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागणी

July 17, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home