Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन!‎‎

mosami kewat by mosami kewat
July 8, 2025
in Uncategorized, बातमी
0
मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन!‎‎
       

मावळ : मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका यांच्यावतीने मावळ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.‎‎

मावळ तालुका कृषिप्रधान असून येथे इंद्रायणी तांदळासाठी प्रसिद्ध असलेली भाताची पिके घेतली जातात, मात्र पावसाच्या संततधारेमुळे अनेक शेतकऱ्यांचे पेरणीपूर्व मशागतीचे नियोजन कोलमडले, तर काहींच्या पेरलेल्या पिकांच्या रोपांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे.

त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत.‎‎ वंचित बहुजन आघाडीने शासनाकडे मागणी केली की, मावळ तालुक्यात तातडीने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा.

‎‎यावेळी आणखी दोन मुद्दे उपस्थित करण्यात आले –

‎‎ग्रामपातळीवरील योजनांचा लाभ गरीब, गरजू लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे गावागावात योजना पोहोचवण्यासाठी प्रभावी नियोजन करावे.‎शाळांमध्ये कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत, त्यामुळे जात, उत्पन्न दाखल्यांसारखी कागदपत्रे त्वरित उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.‎‎

यावेळी संतोष भाऊ लोखंडे (पू. जि. उपाध्यक्ष), राजूभाऊ गायकवाड (पू. जि. संघटक), नितीन ओव्हाळ (अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका, संदीप कदम (अध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी मावळ, मनीषा ओव्हाळ (अध्यक्ष, वंचित बहुजन महिला आघाडी मावळ), दत्ताभाऊ शिंदे, अनिल नाना गायकवाड, संजय भाऊ कुलकर्णी, किसन नाना गायकवाड, गौतम ओव्हाळ, बाळकृष्ण टपाले, लहू लोखंडे, सुनील वाघमारे, अक्षय साळवे, बब्रवान कांबळे, पवन उदागे, प्रमोद खंडारे, ज्योतीताई गायकवाड, आश्लेषा गायकवाड आदी उपस्थित होते. ‎‎या निवेदनाद्वारे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवून त्यांना तातडीने न्याय मिळावा, या भूमिकेतून वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतला आहे.


       
Tags: Farmergovernmentmavalvbaforindia
Previous Post

संविधान दिंडीद्वारे वारीत समतेचा संदेश पंढरपूर वारीत कायदा विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

Next Post

वंचित बहुजन आघाडी अहमदपूर तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

Next Post
वंचित बहुजन आघाडी अहमदपूर तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

वंचित बहुजन आघाडी अहमदपूर तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बहुजन हिताय बहुजन सुखाय भारिप बहुजन महासंघ
चळवळीचा दस्तऐवज

बहुजन हिताय बहुजन सुखाय भारिप बहुजन महासंघ

by mosami kewat
July 29, 2025
0

राष्ट्रीय नेते : खासदार अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष राजा ढाले केंद्रीय कार्यालय डॉ. आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता...

Read moreDetails
‎यांना संविधान आणि समता दोन्हीही खुपत आहेत

‎यांना संविधान आणि समता दोन्हीही खुपत आहेत

July 29, 2025
गाझामध्ये उपासमारीचा हाहाकार: २४ तासांत १४ मृत्यू, मृतांमध्ये नवजात बालकांचा समावेश

गाझामध्ये उपासमारीचा हाहाकार: २४ तासांत १४ मृत्यू, मृतांमध्ये नवजात बालकांचा समावेश

July 29, 2025
शाही जेवणाचं रहस्य

शाही जेवणाचं रहस्य

July 29, 2025
मदारी समाजाच्या 15 कुटुंबांना बेघर केल्याने वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

मदारी समाजाच्या 15 कुटुंबांना बेघर केल्याने वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

July 29, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home