Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Rain : मराठवाड्यात पावसाचा कहर: ८ बळी, शेती उद्ध्वस्त; बचाव कार्यासाठी लष्कर दाखल

mosami kewat by mosami kewat
September 23, 2025
in बातमी
0
Rain : मराठवाड्यात पावसाचा कहर: ८ बळी, शेती उद्ध्वस्त; बचाव कार्यासाठी लष्कर दाखल

Rain : मराठवाड्यात पावसाचा कहर: ८ बळी, शेती उद्ध्वस्त; बचाव कार्यासाठी लष्कर दाखल

       

‎
‎मराठवाडा : गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. धाराशिव, बीड, जालना, आणि संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून, त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
‎
‎सलग सुरू असलेल्या या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. मागील २४ तासांत मराठवाड्यात पावसाने ८ जणांचा बळी घेतला आहे, तर शेकडो जनावरे दगावली आहेत. सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात झाले असून, तिथे ५७ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्या खालोखाल धाराशिव आणि परभणीमध्ये अनुक्रमे २१ आणि २२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. एकूण १२९ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
‎
‎सध्याच्या गंभीर परिस्थितीमुळे बीड, धाराशिव आणि परभणीमध्ये बचाव कार्यासाठी लष्कराला (आर्मी) पाचारण करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमधून लष्कराच्या तुकड्या मदत कार्यासाठी रवाना झाल्या आहेत. गोदावरी नदीच्या वाढत्या पातळीमुळे संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
‎
‎हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः पुढील दोन दिवस मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, धाराशिवमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
‎
‎या संकटामुळे मराठवाड्यातील शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाले असून, त्यांच्यासमोर ‘जगायचं कसं?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.


       
Tags: beedCrop DamageMaharashtraMonsoonrain
Previous Post

मृत्यूनंतरही जात आडवी येते तेव्हा…

Next Post

Raigad : पनवेल महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार

Next Post
Raigad : पनवेल महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार

Raigad : पनवेल महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आपल्याला काय फरक पडतो? ही आत्मघातकी मानसिकता सोडा; जागतिक अर्थकारण तुमच्या आयुष्यात उतरले आहे!
अर्थ विषयक

आपल्याला काय फरक पडतो? ही आत्मघातकी मानसिकता सोडा; जागतिक अर्थकारण तुमच्या आयुष्यात उतरले आहे!

by mosami kewat
December 16, 2025
0

आपल्याला काय फरक पडतो ? जगामध्ये घडणाऱ्या घडामोडींबद्दल असा प्रश्न दीर्घकाळात आत्मघातकी सिद्ध होतो. खरेतर खूप फरक पडतो हे सिद्ध...

Read moreDetails
कोल्हापुरात उद्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ‘विजयी संकल्प महासभा’चे आयोजन

कोल्हापुरात उद्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ‘विजयी संकल्प महासभा’चे आयोजन

December 16, 2025
जायकवाडीच्या अतिक्रमण कारवाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे पैठणमध्ये ठिय्या आंदोलन!

जायकवाडीच्या अतिक्रमण कारवाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे पैठणमध्ये ठिय्या आंदोलन!

December 16, 2025
शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विनम्र अभिवादन

शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विनम्र अभिवादन

December 15, 2025
भिवंडी मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन !

भिवंडी मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन !

December 15, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home