Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दिल्ली सरकारला लाज वाटली पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 5, 2025
in बातमी
0
दिल्ली सरकारला लाज वाटली  पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

मुंबई – हाताने गटार साफ करणे, हाताने मलमूत्र उचलणे, साफ करणे आणि वाहून नेणे ही पद्धत बंद झाली आहे. ही प्रथा अमानवी असल्याचे अनेकवेळा सांगितले गेले आहे. तरीही दिल्ली शहरात राजरोस आजही हाताने गटार साफ केले जात असून, हाताने मैला साफ केला जात असल्याचे वास्तव मांडणारे काही फोटो आणि त्याबाबतचा मजकूर दिल्ली सरकारच्या सामाजिक बांधकाम विभागाने सोशल मीडिया एक्स हॅडलवर शेअर केले आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला असून, त्यांनी दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक न्याय मंत्रालयाला लाज वाटली पाहिजे, असे म्हणत दिल्ली सरकारला जोरदार फटकारले आहे.

प्रकाश आंबेडकर यांंनी सोशल मीडिया एक्सवर लिहताना म्हटले आहे की, आपल्याकडे चंद्रावर पोहोचून परत येण्याचे तंत्रज्ञान आहे, पण आपला समाज आजही जातीने ग्रस्त असून समाज गटार साफ करण्यासाठी यंत्रे वापरण्यास असमर्थ आहे. तसेच हाताने मलमूत्र उचलणे, साफ करणे आणि वाहून नेणे या पद्धतींवर बंदी आहे. परंतु ही अमानवी प्रथा अजूनही प्रचलित आहे. कारण “जात असते आणि ती जात नाही. तसेच ही अमानवी प्रथा थांबवण्यासाठी किंवा स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती अजिबात दिसत नाही असे त्यांनी दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक न्याय विभागाला उद्देशून म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून दिल्ली येथील मैला साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दु:ख मांडले आहे. त्यांनी दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक न्याय विभागाला लाज वाटली पाहिजे असेही म्हटले आहे. तसेच आपल्या देशातील जात वास्तव यानिमित्ताने अधोरेखीत होत असून आपल्याकडील जात वास्तव जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी ही अमानवी प्रथा बंद करण्याची व या कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राजकारणी लोकांची इच्छाशक्ती अजिबात नसल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच या राजकीय लोकांना याबाबत लाज वाटली पाहिजे असेही सुनावले आहे.


       
Tags: delhiMaharashtraPrakash Ambedkarsafai kamgarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘सुप्रीम’ कोर्टाला निवडणुक आयोगाने मारले फाट्यावर – राजेंद्र पातोडे

Next Post

शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Next Post
शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

वादानंतर लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणास पुन्हा सुरूवात
बातमी

वादानंतर लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणास पुन्हा सुरूवात

मुबई - महाराष्ट्रात सुरु असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना मार्च पासून निधी न मिळाल्याने चर्चेचा विषय ठरली होती. ...

June 5, 2025
दोन बायकांच्या भांडणामुळे ठाकरे बंधु वेगळे, स्वार्थासाठी एकत्र येतील   – नितेश राणे
बातमी

दोन बायकांच्या भांडणामुळे ठाकरे बंधु वेगळे, स्वार्थासाठी एकत्र येतील – नितेश राणे

सांगली - मुंबई महापालिका निवडणुुकिच्या पार्शभुमीवर सध्या राज्यात मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या ...

June 5, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ७ लाख नवमतदार राहणार वंचित
बातमी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ७ लाख नवमतदार राहणार वंचित

पुणे - राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च ...

June 5, 2025
दिवाळी फराळ कैद्यांना १२०० रूपये किलोची काजूकतली, राज्यातील कारागृहात प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार – राजू शेट्टी
बातमी

दिवाळी फराळ कैद्यांना १२०० रूपये किलोची काजूकतली, राज्यातील कारागृहात प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार – राजू शेट्टी

पुणे - दिवाळी फराळाच्या नावाखाली राज्यातील कारागृहात प्रंचड मोठा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ...

June 5, 2025
अकरावी प्रवेशाची ऑनलाईन मुदत आज दुपारी संपली,  ऑफलाईन मुतवाढीची वंचितची मागणी
बातमी

अकरावी प्रवेशाची ऑनलाईन मुदत आज दुपारी संपली, ऑफलाईन मुतवाढीची वंचितची मागणी

पुणे - अकरावी प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी आज दि ५ जून रोजी दुपारी दोन वाजता संपली आहे. काल ४ जून अखेर ...

June 5, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क