Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दिल्ली सरकारला लाज वाटली पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 5, 2025
in बातमी
0
दिल्ली सरकारला लाज वाटली  पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

मुंबई – हाताने गटार साफ करणे, हाताने मलमूत्र उचलणे, साफ करणे आणि वाहून नेणे ही पद्धत बंद झाली आहे. ही प्रथा अमानवी असल्याचे अनेकवेळा सांगितले गेले आहे. तरीही दिल्ली शहरात राजरोस आजही हाताने गटार साफ केले जात असून, हाताने मैला साफ केला जात असल्याचे वास्तव मांडणारे काही फोटो आणि त्याबाबतचा मजकूर दिल्ली सरकारच्या सामाजिक बांधकाम विभागाने सोशल मीडिया एक्स हॅडलवर शेअर केले आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला असून, त्यांनी दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक न्याय मंत्रालयाला लाज वाटली पाहिजे, असे म्हणत दिल्ली सरकारला जोरदार फटकारले आहे.

प्रकाश आंबेडकर यांंनी सोशल मीडिया एक्सवर लिहताना म्हटले आहे की, आपल्याकडे चंद्रावर पोहोचून परत येण्याचे तंत्रज्ञान आहे, पण आपला समाज आजही जातीने ग्रस्त असून समाज गटार साफ करण्यासाठी यंत्रे वापरण्यास असमर्थ आहे. तसेच हाताने मलमूत्र उचलणे, साफ करणे आणि वाहून नेणे या पद्धतींवर बंदी आहे. परंतु ही अमानवी प्रथा अजूनही प्रचलित आहे. कारण “जात असते आणि ती जात नाही. तसेच ही अमानवी प्रथा थांबवण्यासाठी किंवा स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती अजिबात दिसत नाही असे त्यांनी दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक न्याय विभागाला उद्देशून म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून दिल्ली येथील मैला साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दु:ख मांडले आहे. त्यांनी दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक न्याय विभागाला लाज वाटली पाहिजे असेही म्हटले आहे. तसेच आपल्या देशातील जात वास्तव यानिमित्ताने अधोरेखीत होत असून आपल्याकडील जात वास्तव जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी ही अमानवी प्रथा बंद करण्याची व या कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राजकारणी लोकांची इच्छाशक्ती अजिबात नसल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच या राजकीय लोकांना याबाबत लाज वाटली पाहिजे असेही सुनावले आहे.


       
Tags: delhiMaharashtraPrakash Ambedkarsafai kamgarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘सुप्रीम’ कोर्टाला निवडणुक आयोगाने मारले फाट्यावर – राजेंद्र पातोडे

Next Post

शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Next Post
शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

एअर इंडिया विमानमध्ये तांत्रिक बिघाड; हाँगकाँगमध्ये आपत्कालीन लँडिंग
बातमी

Mumbai News : एअर इंडिया विमानमध्ये तांत्रिक बिघाड; हाँगकाँगमध्ये आपत्कालीन लँडिंग

मुंबई : एअर इंडियाच्या विमानांमध्ये सतत घडणाऱ्या तांत्रिक बिघाडांच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत. नुकतीच अहमदाबादच्या विमानात घडलेली घटना ताजी ...

June 16, 2025
Mumbai News : नागरिकांचा संताप! गिरगावमध्ये रस्ता खचला, बेस्ट बस पाच फूट खड्ड्यात
बातमी

Mumbai News : नागरिकांचा संताप! गिरगावमध्ये रस्ता खचला, बेस्ट बस पाच फूट खड्ड्यात अडकली

मुंबई : मुंबईच्या गिरगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली. सिग्नलजवळ मेट्रोचे काम सुरू होते. त्याच ठिकाणी अगदी जवळून जात असताना ...

June 16, 2025
Indrayani Kundmala Bridge Collapse: बाप लेकाचा मृत्यू; फादर्स डे सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते पुण्यातील कुंडमळावर
बातमी

Indrayani Kundmala Bridge Collapse: बाप लेकाचा मृत्यू; फादर्स डे सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते पुण्यातील कुंडमळावर

पुणे : पुण्यातील नदीवरील पूल कोसळल्यामुळे मोठी घटना घडली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मावळ तालुक्यातील कुंडमळा ...

June 16, 2025
अग्निवीर मुरली नाईक यांना शहीदाचा दर्जा द्या, कुटुंबाला एक कोटींची मदत करा: प्रकाश आंबेडकरांची मागणी
बातमी

अग्निवीर मुरली नाईक यांना शहीदाचा दर्जा द्या, कुटुंबाला एक कोटींची मदत करा: प्रकाश आंबेडकरांची मागणी

मुंबई: घाटकोपर येथील रहिवासी असलेले अग्निवीर मुरली नाईक यांना सेवेत असताना वीरमरण आले, मात्र त्यांच्या कुटुंबाला केंद्र किंवा राज्य सरकारकडून ...

June 16, 2025
ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन ; वैष्णवी हागुणे यांनी पटकावला प्रथम क्रमांक
बातमी

ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ; वैष्णवी हागुणे यांनी पटकावला प्रथम क्रमांक

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त १० मे २०२५ रोजी एक भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित ...

June 16, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क