Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ईव्हीएम बिघाड, गोंधळ अन् राडा! राज्यभर महापालिका निवडणुकीत मतदारांना मनस्ताप

mosami kewat by mosami kewat
January 15, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ईव्हीएम बिघाड, गोंधळ अन् राडा! राज्यभर महापालिका निवडणुकीत मतदारांना मनस्ताप
       

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात राडा पाहायला मिळाला. या निवडणुकीत शाई पुसण्यापासून ते ईव्हीएम बंद पडणे, पैशांची पाकिटे वाटणे आणि कार्यकर्त्यांमधील हाणामारी अशा अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.

मालेगावातून एक धक्कादायक बाब समोर आली. एकाच ठिकाणी ८०० हून अधिक मतदान कार्ड सापडली. हे मतदान कार्ड बोगस असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

पिंपरीत मतदान केंद्रावर राडा

पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव नाही. मतदार याद्या व्यवस्थित नाहीत, उमेदवाराला न विचारता EVM मशीन वरील स्टिकर निवडणूक विभागाने काढून टाकले, बदलले, असे आरोप करण्यात आले. निवडणूक आयोगाकडे याची तक्रारही केली होती. मात्र तक्रारीची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे थेट मतदान केंद्रावरच महिलेने राडा घालत निवडणूक आयोगाची गाडी रोखली.

ओळखपत्र नसल्याने मतदार माघारी

जळगाव शहरातील आर. आर. विद्यालय मतदान केंद्रावर सकाळपासूनच वातावरण तापले होते. काही संशयास्पद व्यक्ती बोगस मतदान करण्यासाठी येत असल्याचा दावा करण्यात आले. तक्रारीची दखल घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी संशयित मतदारांची कसून तपासणी केली. तब्बल ४० ते ४५ मतदारांकडे वैध ओळखपत्रे नसल्याचे समोर आले, त्यामुळे त्यांना मतदान न करताच केंद्रावरून परत पाठवण्यात आले.

कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

अकोला महापालिकेच्या प्रभाग १७ मधील भांडपुरा चौक परिसरात असलेल्या उर्दू कन्या शाळेत मतदानादरम्यान मोठा राडा झाला.
सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, मात्र किरकोळ कारणावरून दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, ज्यामुळे मतदान केंद्रावर एकच पळापळ सुरू झाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि बळाचा वापर करून जमावाला पांगवण्यात आले. 

या गोंधळामुळे निवडणूक आयोगावर चहूबाजूंनी टीका होत आहे. ही निवडणूक केवळ बोटाला लावलेली शाई पुसण्याची नसून, लोकशाही पुसून टाकण्याचा एक डाव आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे दिसले.


       
Tags: AkolaElectionElection commissionjalgaonMaharashtraMaharashtra election newsMunicipal corporation electionpoliticspuneVanchit Bahujan AaghadivbaforindiaVoting
Previous Post

पुण्यात ‘शाही’चा खेळ की बोगसगिरीचा मेळ? मार्कर पेनच्या पुसट खुणांनी निवडणूक प्रक्रियेचे वाभाडे!

Next Post

वंचित बहुजन आघाडी सत्तेच्या पटावर निर्णायक !

Next Post
वंचित बहुजन आघाडी सत्तेच्या पटावर निर्णायक !

वंचित बहुजन आघाडी सत्तेच्या पटावर निर्णायक !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पालोदमध्ये परिवर्तनाची लाट! सुजात आंबेडकरांच्या सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
बातमी

पालोदमध्ये परिवर्तनाची लाट! सुजात आंबेडकरांच्या सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

by mosami kewat
February 4, 2026
0

विकासाचा निधी लुटणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली – सुजात आंबेडकर यांचे जोरदार आवाहन औरंगाबाद: "आतापर्यंत जनतेच्या विकासासाठी आलेला निधी लुटणाऱ्यांना...

Read moreDetails
चळवळीचे मुखपत्र जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी – प्रा. अंजलीताई आंबेडकर

चळवळीचे मुखपत्र जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी – प्रा. अंजलीताई आंबेडकर

February 4, 2026
रविंद्र गोविंद ओव्हाळ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास ५ हजारांचे धम्मदान

रविंद्र गोविंद ओव्हाळ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास ५ हजारांचे धम्मदान

February 4, 2026
प्रस्थापितांच्या लूटमारीला रोखण्यासाठी वंचितांचे प्रतिनिधी सभागृहात पाठवा! – सुजात आंबेडकर

प्रस्थापितांच्या लूटमारीला रोखण्यासाठी वंचितांचे प्रतिनिधी सभागृहात पाठवा! – सुजात आंबेडकर

February 4, 2026
‘गृहमंत्र्यांना बोलवा!’ सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची खंडपीठात आक्रमक भूमिका

‘गृहमंत्र्यांना बोलवा!’ सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची खंडपीठात आक्रमक भूमिका

February 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home