Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

योजनांचा डंका पण वास्तव भीषण : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा भयावह; ८ महिन्यांत ११८३ मृत्यू

mosami kewat by mosami kewat
September 10, 2025
in बातमी
0
योजनांचा डंका पण वास्तव भीषण: महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा भयावह; ८ महिन्यांत ११८३ मृत्यू

योजनांचा डंका पण वास्तव भीषण: महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा भयावह; ८ महिन्यांत ११८३ मृत्यू

       

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत, ही एक अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. राज्य सरकारने समुपदेशन केंद्र, शेतीमालाला योग्य भाव आणि सिंचन सुविधा वाढवण्यासारखे अनेक उपाययोजना केल्याचा दावा केला असला तरी, गेल्या आठ महिन्यांत ११८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
‎
‎या आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत ही भयावह परिस्थिती दिसून येते. सर्वाधिक आत्महत्यांची नोंद अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागात झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात ५२० तर पश्चिम विदर्भात ७०७ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. ‎विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात तब्बल ४४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने परिस्थितीची भीषणता अधिक स्पष्ट होते.
‎
‎शेतकरी आत्महत्यांची कारणे आणि मदतीची स्थिती:

‎या आत्महत्यांची मुख्य कारणे अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि शेतमालाला योग्य हमीभाव न मिळणे अशी आहेत.
‎
‎आत्महत्या केलेल्या ११३८ शेतकऱ्यांपैकी केवळ ६०७ शेतकरी कुटुंबं मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर ३०६ आत्महत्या अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. यामुळे सरकारी मदतीची प्रक्रिया आणि धोरणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‎
‎महाराष्ट्रातील १४ शेतकरी आत्महत्या प्रवण जिल्ह्यांमध्ये विदर्भातील सहा आणि मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. सरकारने केलेल्या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.


       
Tags: cmCropFarmermaharashtra farmerpmVanchit Bahujan Aaghadivbafotindia
Previous Post

Beed : परळीत शेख शाकेर अहमद यांच्यासह असंख्य तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Next Post

वंचित बहुजन आघाडीचे लातूर आणि उस्मानाबादमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन

Next Post
वंचित बहुजन आघाडीचे लातूर आणि उस्मानाबादमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन

वंचित बहुजन आघाडीचे लातूर आणि उस्मानाबादमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर
बातमी

भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर

by mosami kewat
November 14, 2025
0

हिंगोली : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी...

Read moreDetails
बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

November 14, 2025
नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

November 14, 2025
राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

November 14, 2025
सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!

सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!

November 14, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home