Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

इराण-इस्रायल संघर्षाच भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम; प्रकाश आंबेडकर यांची केंद्राला निर्णय घेण्याचे आवाहन

Tanvi Gurav by Tanvi Gurav
June 19, 2025
in बातमी, राजकीय, विशेष, सामाजिक
0
इराण-इस्रायल संघर्षाच भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम; प्रकाश आंबेडकर यांची केंद्राला निर्णय घेण्याचे आवाहन

इराण-इस्रायल संघर्षाच भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम; प्रकाश आंबेडकर यांची केंद्राला निर्णय घेण्याचे आवाहन

       

मुंबई : इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर परिणाम होताना दिसून येत आहे. यामध्ये कच्च्या तेलाच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. याचा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम दिसून येईल. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चिंता व्यक्त करत केंद्र सरकारला तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत एक्स (Twitter) हँडलवरून ट्विट करत म्हटले की, इस्रायल-इराण संघर्षाचा पुढील काही महिन्यांत भारताच्या अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कच्चा तेल आयात करणारा देश आहे. तेल दरवाढीमुळे देशाची आर्थिक स्थिती असुरक्षित बनत आहे.

तेल दरवाढीचे संभाव्य परिणाम या संघर्षामुळे तेल पुरवठा अडथळ्यांत सापडण्याची शक्यता असून, शिपमेंट खर्चात वाढ होणार आहे. परिणामी, तेलाच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय रिफायनऱ्यांना तेल खरेदीसाठी अधिक डॉलर्सची गरज भासेल, त्यामुळे डॉलरची मागणी वाढेल, रुपयाचे अवमूल्यन होईल आणि इंधन आयात अधिक महागडे होईल. यामुळे देशाच्या चालू खात्यातील तूट (CAD) वाढण्याचा धोका आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला सुचवलेल्या उपाययोजना –

1. तेल करारांमध्ये विविधता: केवळ मध्यपूर्वेवर अवलंबून न राहता इतर देशांबरोबरही तेल आयातीसाठी पर्यायी करार करण्यात यावेत.

2. इंधन दर नियंत्रणात ठेवावेत: उत्पादन शुल्क कमी करून किंवा अनुदानाच्या माध्यमातून इंधनाचे दर मर्यादित ठेवावेत, जेणेकरून महागाईवर नियंत्रण मिळवता येईल.

3. रुपयाची अस्थिरता रोखा: रिझर्व्ह बँकेने (RBI) परकीय चलन बाजारात हस्तक्षेप करून रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्याचे उपाय करावेत.

प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, “ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, केंद्र सरकारने तातडीने आणि दूरदृष्टीने निर्णय घेणे गरजेचे आहे.


       
Tags: economyIranisraelmumbaiPrakash AmbedkarRBI
Previous Post

Maruti Chitampalli Death: वर्याच्या ९३ व्या वर्षी निधन, वनविद्येचे अभ्यासक, पद्मश्री मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड

Next Post

Pune Crime News : ‘लिपस्टिक’ने लिहिली अखेरची चिठ्ठी; विवाहितेची चिमुकल्यासह इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

Next Post
पुणे: 'लिपस्टिक'ने लिहिली अखेरची चिठ्ठी; विवाहितेची चिमुकल्यासह इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

Pune Crime News : 'लिपस्टिक'ने लिहिली अखेरची चिठ्ठी; विवाहितेची चिमुकल्यासह इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
औरंगाबाद महापालिका निवडणूक: प्रभाग ९ मध्ये शिवसेनेची (UBT) माघार; वंचितचे सतीश पटेकर यांना जाहीर पाठिंबा
बातमी

औरंगाबाद महापालिका निवडणूक: प्रभाग ९ मध्ये शिवसेनेची (UBT) माघार; वंचितचे सतीश पटेकर यांना जाहीर पाठिंबा

by mosami kewat
January 2, 2026
0

औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ९ मध्ये एक अनपेक्षित राजकीय खळबळ उडाली आहे. या प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या...

Read moreDetails
ठाण्यात निवडणुकीच्या तोंडावर राडा! वंचितचे उमेदवार संतोष खरात यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड

ठाण्यात निवडणुकीच्या तोंडावर राडा! वंचितचे उमेदवार संतोष खरात यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड

January 2, 2026
वसई-विरार महानगरपालिका निवडणूक: उमेदवारांची पहिली ११ प्रभागनिहाय यादी जाहीर

वसई-विरार महानगरपालिका निवडणूक: उमेदवारांची पहिली ११ प्रभागनिहाय यादी जाहीर

January 1, 2026
नवी मुंबई महापालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडीची 18 उमेदवारांची यादी जाहीर

नवी मुंबई महापालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडीची 18 उमेदवारांची यादी जाहीर

January 1, 2026
“भीमा कोरेगावचा इतिहास हा मानवतेचा इतिहास”; ५०० शूरवीरांना अभिवादन करताना बाळासाहेब आंबेडकरांचे प्रतिपादन

“भीमा कोरेगावचा इतिहास हा मानवतेचा इतिहास”; ५०० शूरवीरांना अभिवादन करताना बाळासाहेब आंबेडकरांचे प्रतिपादन

January 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home