मधपूर्वेतील तणावाने पुन्हा एकदा उंची गाठल्यानंतर अखेर इस्राइल आणि इराणमधील थेट संघर्ष आटोपल्याचे संकेत मिळाले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांमुळे जागतिक पातळीवर चिंता वाढली होती. युद्धविरामाबाबत अनेक तर्कवितर्क होत असतानाच, अखेर दोन्ही देशांनी संघर्ष थांबवण्याचे संकेत दिले.
मात्र युद्धविरामाच्या काही तास आधी, इराणने इस्राइलच्या एका महत्त्वाच्या लष्करी तळावर टार्गेटेड हल्ला करत, “जर आमच्या सीमांवर धोका निर्माण झाला तर आम्ही पुन्हा प्रत्युत्तर देऊच,” असा स्पष्ट इशारा दिला.
या कारवाईनंतर इस्राइलकडून कोणतीही थेट प्रतिक्रिया आली नसली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने आणि युनायटेड नेशन्सने मध्यस्थीची भूमिका बजावल्याचे समजते.
सध्या संघर्ष शांत झाल्याची घोषणा करण्यात आली असली तरी दोन्ही देशांच्या सीमांवर तणाव कायम असून जागतिक नेते या परिस्थितीकडे बारकाईने पाहत आहेत.
या संघर्षामुळे इंधन दरांपासून ते आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालीपर्यंत अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला होता. आता युद्धविरामामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी, इराणच्या अखेरच्या हल्ल्यामुळे भविष्यातील धोके कायम असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.