Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

सत्ता परिवर्तन महासभेत शेकडो नेत्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 7, 2024
in राजकीय
0
सत्ता परिवर्तन महासभेत शेकडो नेत्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश !
       

नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नवी मुंबई नेरूळ येथे आयोजित सत्ता परिवर्तन महासभेत विविध पक्ष संघटनांच्या शेकडो नेत्यांनी वंचितमध्ये पक्ष प्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत अनेकांनी पक्ष प्रवेश केला. या वेळी सत्ता परिवर्तन महासभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्याचप्रमाणे सर्व जाती धर्माचे नेते मंचावर उपस्थित होते.

या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षातून जगदीश घरत, नासिर रशिद शेख, पवन निखाडे, राहुल चव्हाण, अविनाश अडागळे, अमन मंगवना, दिनेश साळवे, जितेंद्र काबंळे, विनय मोरे, अबु बाखर नाखवा, अरबाज शेख, गणपत शेलार, सुशील मोरे आणि किरण ठाकरे यांनी वंचितमध्ये प्रवेश केला. तसेच, मुस्लिम समाजातील नेते मोहम्मद फैजल शेख, शेख शहाबुद्दीन सिद्दीकी, नसिर खान, खालीद भाई यांनी वंचितमध्ये पक्ष प्रवेश केला. खाटीक समाजाचे नेते शमसुद्दीन मोमीन, सर्वर खान तसेच, आदिवासी समाजाचे नेते ॲड. सुनील टोटावाड, संपत वळवी, लक्ष्मण मुठे, अमोल भालेकर या सर्व आदिवासी नेत्यांनीही वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश केला. याबरोबर मारवाडी समाज, मातंग समाजातील नेत्यांनीही पक्ष प्रवेश केला.

सत्ता परिवर्तन आवश्यक

देशात सध्या हुकूमशाहीची राजवट आली आहे. ती बदलायची असेल तर सत्ता परिवर्तन करणे आवश्यक आहे. देशातील तरुण दिशाहीन झाला आहे. त्यामुळे परिवर्तन होणे गरजेचे आहे. तसेच, तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन असणे आवश्यक आहे. ते मार्गदर्शन सध्या ॲड. प्रकाश आंबेडकरच करु शकतात असा विश्वास ॲड. सुनील टोटावाड यांनी व्यक्त केला.


       
Tags: mumbaiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात कर्ज २४ रुपयांवरुन ८४ रुपयांवर !

Next Post

वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चेचे धोरण संथ का?

Next Post
वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चेचे धोरण संथ का?

वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चेचे धोरण संथ का?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी
बातमी

आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

by mosami kewat
March 26, 2026
0

आंध्र प्रदेश : मार्कापुरम जिल्ह्यातील रायवरम परिसरात गुरुवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. खासगी ट्रॅव्हल्सची बस आणि डंपर यांच्यात झालेल्या...

Read moreDetails
नागपूरची ठिणगी !

नागपूरची ठिणगी !

March 26, 2026
युद्धाचा खेळ की भूमिका-वाटप? ट्रम्प–नेत्यानाहू आणि इराणवरील सावट

युद्धाचा खेळ की भूमिका-वाटप? ट्रम्प–नेत्यानाहू आणि इराणवरील सावट

March 26, 2026
मोदींच्या नेतृत्वावर परकीय दबावाची छाया – ॲड. प्रकाश आंबेडकर

मोदींच्या नेतृत्वावर परकीय दबावाची छाया – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 26, 2026
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; इतिहास क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; इतिहास क्षेत्रावर शोककळा

March 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home