Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

हिंगणघाटमध्ये दोन दिवसांत दोन धक्कादायक घटना, शहरात भीतीचं वातावरण

mosami kewat by mosami kewat
August 23, 2025
in Uncategorized
0
       

‎‎हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहराला गेल्या दोन दिवसांपासून दोन वेगवगळ्या घटनांनी हादरवून सोडलं आहे. पोळ्याच्या सणादरम्यान दोन दिवसांत दोन मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या दोन्ही घटनांची नोंद पोलिसांनी घेतली असून, तपास सुरू आहे.

‎‎शुक्रवारी सायंकाळी हिंगणघाट शहरातील इंदिरा वॉर्डमध्ये एका महिलेची हत्या झाल्याचं समोर आलं. सुभाष लक्ष्मण वैद्य नावाच्या व्यक्तीने आपली पत्नी माधुरीचा खून करून तिचा मृतदेह घराजवळील एका रिकाम्या जागेत पुरला. पती-पत्नीमधील वादामुळे ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.‎‎

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरीच्या आई-वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला असता, जळालेल्या अवस्थेत माधुरीचे कपडे आणि इतर वस्तू आढळल्या. संशय आल्याने पोलिसांनी परिसरातील माती खणली असता, दहा फूट खोल खड्ड्यात पुरलेला माधुरीचा मृतदेह आढळला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी सुभाषने जेसीबीच्या मदतीने हा खड्डा खोदला होता.

या प्रकरणी पोलिसांनी सुभाषच्या मामाला ताब्यात घेतलं असून, मुख्य आरोपी सुभाष हा अजूनही फरार आहे.‎‎ आज सकाळी हिंगणघाट तालुक्यातील धांबा गावाजवळच्या एका नाल्यात एका अनोळखी युवकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला आहे.

मात्र, अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.‎या युवकाचा मृत्यू नेमका कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही हत्या आहे की आत्महत्या, याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


       
Previous Post

त. बुद्धांचा अपमान करणारे सावरकर लिखित संन्यस्त खड्ग नाटक दाखवू नये; वंचित बहुजन आघाडीची मागणी!

Next Post

पावसाचा कहर: पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती गंभीर; भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू‎‎

Next Post
पावसाचा कहर: पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती गंभीर; भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू‎‎

पावसाचा कहर: पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती गंभीर; भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू‎‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बांधकाम कामगार श्रमिक सेना ‘वंचित बहुजन आघाडी’मध्ये!
बातमी

बांधकाम कामगार श्रमिक सेना ‘वंचित बहुजन आघाडी’मध्ये!

by mosami kewat
November 20, 2025
0

पुणे: बांधकाम कामगार आणि श्रमिकांना संघटित करणारी महत्त्वपूर्ण संघटना असलेल्या बांधकाम कामगार श्रमिक सेना (महाराष्ट्र राज्य) या संघटनेने वंचित बहुजन...

Read moreDetails
संविधान सन्मान महासभेसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा : भारतीय बौद्ध महासभा

संविधान सन्मान महासभेसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा : भारतीय बौद्ध महासभा

November 20, 2025
प्रस्थापितांविरोधात सुजात आंबेडकरांचा एल्गार; बीडमध्ये वंचितची शक्तिप्रदर्शन सभा

प्रस्थापितांविरोधात सुजात आंबेडकरांचा एल्गार; बीडमध्ये वंचितची शक्तिप्रदर्शन सभा

November 20, 2025
नवी मुंबई : श्रमिकनगर झोपडपट्टीवासियांसाठी आम्ही लढू - वंचित बहुजन आघाडी

नवी मुंबई : श्रमिकनगर झोपडपट्टीवासियांसाठी आम्ही लढू – वंचित बहुजन आघाडी

November 20, 2025
Mumbai : बौद्ध समाज संवाद दौरा मुंबईत उत्साहात पार

Mumbai : बौद्ध समाज संवाद दौरा मुंबईत उत्साहात पार

November 20, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home