Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

हिंगणघाटमध्ये दोन दिवसांत दोन धक्कादायक घटना, शहरात भीतीचं वातावरण

mosami kewat by mosami kewat
August 23, 2025
in Uncategorized
0
       

‎‎हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहराला गेल्या दोन दिवसांपासून दोन वेगवगळ्या घटनांनी हादरवून सोडलं आहे. पोळ्याच्या सणादरम्यान दोन दिवसांत दोन मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या दोन्ही घटनांची नोंद पोलिसांनी घेतली असून, तपास सुरू आहे.

‎‎शुक्रवारी सायंकाळी हिंगणघाट शहरातील इंदिरा वॉर्डमध्ये एका महिलेची हत्या झाल्याचं समोर आलं. सुभाष लक्ष्मण वैद्य नावाच्या व्यक्तीने आपली पत्नी माधुरीचा खून करून तिचा मृतदेह घराजवळील एका रिकाम्या जागेत पुरला. पती-पत्नीमधील वादामुळे ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.‎‎

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरीच्या आई-वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला असता, जळालेल्या अवस्थेत माधुरीचे कपडे आणि इतर वस्तू आढळल्या. संशय आल्याने पोलिसांनी परिसरातील माती खणली असता, दहा फूट खोल खड्ड्यात पुरलेला माधुरीचा मृतदेह आढळला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी सुभाषने जेसीबीच्या मदतीने हा खड्डा खोदला होता.

या प्रकरणी पोलिसांनी सुभाषच्या मामाला ताब्यात घेतलं असून, मुख्य आरोपी सुभाष हा अजूनही फरार आहे.‎‎ आज सकाळी हिंगणघाट तालुक्यातील धांबा गावाजवळच्या एका नाल्यात एका अनोळखी युवकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला आहे.

मात्र, अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.‎या युवकाचा मृत्यू नेमका कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही हत्या आहे की आत्महत्या, याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


       
Previous Post

त. बुद्धांचा अपमान करणारे सावरकर लिखित संन्यस्त खड्ग नाटक दाखवू नये; वंचित बहुजन आघाडीची मागणी!

Next Post

पावसाचा कहर: पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती गंभीर; भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू‎‎

Next Post
पावसाचा कहर: पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती गंभीर; भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू‎‎

पावसाचा कहर: पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती गंभीर; भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू‎‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Aurangabad : दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
बातमी

Aurangabad : दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

by mosami kewat
May 23, 2026
0

औरंगाबाद : जानेफळ (ता. वैजापूर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत वंचित...

Read moreDetails
चार तासांची बैठक आणि जुमलेबाजी

चार तासांची बैठक आणि जुमलेबाजी

May 23, 2026
Nanded News: उन्हापासुन बचावासाठी ट्रॅफिक पोलिसांना छत्रीचे वाटप!

Nanded News: उन्हापासुन बचावासाठी ट्रॅफिक पोलिसांना छत्रीचे वाटप!

May 23, 2026
भारताने इस्रायलला लष्करी स्टील पुरवठा केल्यानेच इटलीने भारताची ४ जहाजे रोखली : ॲड. प्रकाश आंबेडकर

भारताने इस्रायलला लष्करी स्टील पुरवठा केल्यानेच इटलीने भारताची ४ जहाजे रोखली : ॲड. प्रकाश आंबेडकर

May 22, 2026
पैठण पंचायत समितीत दिव्यांग कल्याण ५% सेस निधी योजना तात्काळ राबविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

पैठण पंचायत समितीत दिव्यांग कल्याण ५% सेस निधी योजना तात्काळ राबविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

May 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home