Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ओबीसींचे आरक्षण हिंदुत्ववादी पक्षानेच काढले – अॅड प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 20, 2022
in बातमी
0
ओबीसींचे आरक्षण हिंदुत्ववादी पक्षानेच काढले – अॅड प्रकाश आंबेडकर
0
SHARES
301
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

जमावबंदी झुगारून ‘वंचित’चा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला!

मुंबई : या देशात सवर्ण विरुद्ध ओबीसी असा परंपरेचा वाद चालत आलेला आहे. ओबीसी हा हिंदू असूनही तो केवळ संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सत्तेचा वाटेकरी होवू पाहतो आहे. आणि म्हणून ज्या मार्गाने हा समूह सत्तेपर्यंत येवू पाहतो आहे तो मार्गच बंद करा, ही नीती भाजपा – आरएसएस या हिंदुत्ववादी पक्षाने आखली असल्याची प्रखर टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात ‘ओबीसी आरक्षणा’ संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता. राज्य सरकारचा जमावबंदी आदेश झुगारून ओबीसी आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेटवर धडकला. ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी विधानभवन परिसर घोषणांनी दणाणून सोडला.

अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा ठराव राज्य सरकारने विधानसभा अधिवेशनात मांडावा आणि तो ठराव केंद्र सरकारला आणि जनगणना आयोगास पाठवावा तसेच त्यासाठी लागणारा खर्च करायला राज्य सरकार तयार असल्याचे सांगावे जेणेकरून केंद्राला ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी लागेल आणि त्यातून आवश्यक असलेला इम्पीरिकल डेटा प्राप्त होईल’ . केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची मिलीभगत असून यांनी मिळून ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव आखल्याचा आरोप यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ओबीसी समाजाचे आज राजकीय आरक्षण रद्द झालेले आहे. येत्या काळात ओबीसींचे नोकरीत आरक्षण, शैक्षणिक आरक्षण रद्द करण्याचा घाट सरकारने घेतला आहे. ओबीसी नेते म्हणवून घेणारे काही बोलायला तयार नाही हे आता ओबीसी समाजाच्या लक्षात यायला लागले आहे. आणि म्हणून मोर्चामध्ये ओबीसी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे.

महाराष्ट्र सरकारने कोणतेही कारण नसतांना १४४ कलम लावले. पोलीसांच्या आडून सरकारने मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीची गळचेपी करणारी भूमिका सरकारची असली, तरी त्याला शह देवून आज हजारो कार्यकर्ते बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेला साद देत विधानभवनावर धडकले हा संविधानाचा विजय आहे. महाराष्ट्रातील ओबीसी या मोर्चाकडे आशेने पाहतो आहे. कारण ओबीसींच्या भवितव्याचा प्रश्न आज निर्माण झाला आहे. ओबीसी देशाच्या उद्योग व्यवस्थेचा कणा आहे. परंतु त्याच्या विकासासाठी गेल्या ७५ वर्षांमध्ये केंद्र आणि राज्य सरकार बजेट निर्माण करू शकले नाही. हे आंदोलन एक सुरूवात आहे. इथुन पुढे खरा संघर्ष सुरू होणार आहे.

रेखा ठाकूर, प्रदेशाध्यक्षा वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र

आंदोलनकर्त्यांची पोलीसांनी अडवणूक केली असली तरी आपल्या न्याय हक्कासाठी राज्यभरातील ओबीसी बांधव या मार्चामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात उभा राहीला आहे. प्रस्तापित पक्षांमधील ओबीसी नेते ओबीसींबाबत ठोस भूमिका घेतांना दिसत नाहीत. त्यामुळे राजकीय आरक्षणाबरोबर ओबीसींचे इतर आरक्षण रद्द होण्याची चिन्हे दिसत आहेत. ही भीती ओळखून ओबीसी समूह बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्त्वात लढा द्यायला सज्ज झाला आहे. हे आजच्या मोर्चाने सिद्ध केले आहे.

अबुल हसन खान, मुंबई अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

ओबीसी आरक्षणासाठी जमावबंदी आदेश झुगारून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी विधानसभा अधिवेशनावर मोर्चा काढणार असल्याचे वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते. सकाळपासून मुंबईत येणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली होती. विधानभवन परिसरात पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली होती. त्यामुळे वंचितचा मोर्चा विधानभवनापर्यंत पोहचण्या आधीच अडवला जाईल अशी रणनीती पोलिसांनी आखली होती. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकत्यांनी गनिमी काव्याने हजारो कार्यकर्ते विधानभवन परिसरात आधीच विखरून उभे केले होते. अँड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांचे विधानभवन गेटवर आगमन होताच कार्यकत्यांनी एकत्र येत सरकार विरोधी घोषणाबाजी सुरू केली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, महिला आघाडी उपाध्यक्ष सविता मुंडे, प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ, किसन चव्हाण, अनिल जाधव, सर्वजित बनसोडे, गोविंद दळवी, सिद्धार्थ मोकळे, प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद, प्रियदर्शी तेलंग, युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकिर तांबोळी, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामनराव गायकवाड, मुंबई प्रदेशाध्यक्ष अबुल हसन खान, महासचिव आनंद जाधव, संघटक विकास पवार आणि राज्यभरातून आलेले हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: hindutvaobcPrakash AmbedkarreservationVanchit Bahujan Aaghadiआरक्षणहिंदुत्व
Previous Post

पुसदमध्ये वंचित बहुजन आघाडीचे आरोग्य शिबिर संपन्न; उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कौतुक

Next Post

भूम तालुक्यातील शाखापूर ग्रामपंचायत सदस्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

Next Post
भूम तालुक्यातील शाखापूर ग्रामपंचायत सदस्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

भूम तालुक्यातील शाखापूर ग्रामपंचायत सदस्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी
बातमी

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी

कोल्हापूर : कोल्हापूर येथील एका व्यावसायिकाच्या घरावर ईडीची धाक पडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आले. भरत लठ्ठे नाव असून ते ...

June 21, 2025
Crime news: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या
बातमी

Crime News: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या

नवी मुंबई : मस्करीची कुस्करी झाली. तुर्भे येथील धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आली. ही घटना ...

June 21, 2025
IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा ; ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा – प्रकाश आंबेडकर

पुणे : पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बँकिंग क्षेत्रातील परीक्षा घेणाऱ्या संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल ...

June 21, 2025
Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर
बातमी

Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर

नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराष्ट्राचे ओबीसी नेते, माजी खासदार आणि विधानसभेचे विरोधी ...

June 21, 2025
कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!
बातमी

कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!

चंद्रपूर : बांधकाम कामगारांना 90 दिवसांच्या नोंदणीवर नाहरकत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी ग्रामसेवकांकडून होणाऱ्या टाळाटाळीविरोधात वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने चंद्रपूर जिल्हा ...

June 20, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क