Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 3, 2025
in राजकीय
0
ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल !
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

– निवडणूक आयोगाला कोर्टाने पाठवली नोटीस

– सायंकाळी 6 नंतर मतदान कसे वाढले ?

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी जाहीर करताना काही मतदारसंघात तफावत आढळली होती. त्यावर वंचित बहुजन आघाडीने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यानंतर इतरही राजकीय पक्षांनी आवाज उठवला होता. पण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याचिकेद्वारे केलेल्या मागणीनुसार उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावली असून, दोन आठवड्यात खुलासा सादर करावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर ॲड. आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केले होते.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, “निवडणुकीचा निकाल देताना, पोल व्होटस् अन् काऊंटर व्होटस् यांची जुळवणी झाली पाहिजे. ती झाली नसेल, तर रिटर्निंग ऑफिसरने तो दस्ताऐवज निवडणूक आयोगाकडे पाठवले पाहिजे आणि निवडणूक आयोगाने त्यावर जे निर्देश देतील, त्यानुसार निकाल पाहिजे”. निवडणूक आयोगाने आदर्श नियमावली पाळली नाही, असाही आक्षेप ॲड. आंबेडकर यांनी घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा वाजल्यानंतर 76 लाख मतदान कसं वाढलं, यावर याचिकेद्वारे आक्षेप घेण्यात आला आहे. मतदानाचे व्हिडिओ देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीपासून हा मुद्दा लावून धरला असून, केवळ प्रश्न उपस्थित करून आम्ही हा मुद्दा सोडून दिलेला नाही. तर आमचा पाठपुरावा सुरू आहे. न्यायालयीन पातळीवर आम्ही निवडणूक आयोगाला याबाबत खुलासा करण्याची विनंती केली आहे, असे याचिका दाखल केली होती तेंव्हा आंबेडकर यांनी याआधी सांगितले होते. त्याच प्रकरणात आता हायकोर्टाने दखल घेऊन निवडणूक आयोगाला नोटीस बजावल्याने वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याचे हे मोठे यश मानले जात आहे.


       
Tags: Election commissionEVMMaharashtraPrabuddh BharatPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVidhansabha Election
Previous Post

अमृतसर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन !

Next Post

२ एकर जागेत उभारणार, संविधान भवन !

Next Post
२ एकर जागेत उभारणार, संविधान भवन !

२ एकर जागेत उभारणार, संविधान भवन !

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी
बातमी

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी

कोल्हापूर : कोल्हापूर येथील एका व्यावसायिकाच्या घरावर ईडीची धाक पडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आले. भरत लठ्ठे नाव असून ते ...

June 21, 2025
Crime news: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या
बातमी

Crime News: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या

नवी मुंबई : मस्करीची कुस्करी झाली. तुर्भे येथील धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आली. ही घटना ...

June 21, 2025
IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा ; ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा – प्रकाश आंबेडकर

पुणे : पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बँकिंग क्षेत्रातील परीक्षा घेणाऱ्या संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल ...

June 21, 2025
Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर
बातमी

Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर

नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराष्ट्राचे ओबीसी नेते, माजी खासदार आणि विधानसभेचे विरोधी ...

June 21, 2025
कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!
बातमी

कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!

चंद्रपूर : बांधकाम कामगारांना 90 दिवसांच्या नोंदणीवर नाहरकत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी ग्रामसेवकांकडून होणाऱ्या टाळाटाळीविरोधात वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने चंद्रपूर जिल्हा ...

June 20, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क