Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

आम्हाला सत्ता द्या, आम्ही हमीभावाचा कायदा करतो – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 19, 2024
in राजकीय
0
आम्हाला सत्ता द्या, आम्ही हमीभावाचा कायदा करतो – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

खोटारडे आणि फसवे राजकारणी ओळखा

वर्धा : आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचा कायदा केल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्धा येथील वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या महाएल्गार सभेत केले आहे.

हमीभावाचा कायदा करायला पाहिजे असे आमचे म्हणणे आहे, जेणेकरून या कायद्याचं उल्लंघन केले, तर त्या व्यापाऱ्यांवर कारवाई करता येईल असेही त्यांनी सांगितले.

जे खोटारडे आणि फसवे आहेत. त्यांच्या हातात पुन्हा पाच वर्षे सत्ता देता कामा नये, हे लक्षात घ्यायला पाहिजे. दिल्लीत शेतकरी आंदोलनाला बसला आहे. आज मजुरांची चर्चाच होताना दिसत नाही. शेतकरी इर्शेला पेटला आहे. कारण, हे लालांच सरकार आहे, या मुद्द्यांकडे लक्ष वेधत सध्याचे सरकार सामान्य माणसाचे नसल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली.

सभेला लाखो नागरिकांची गर्दी

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेसाठी वर्धा जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिक मोठ्या संख्येने आले होते. सभेपूर्वी मैदान भरगच्च भरले होते. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, शेतमालाला हमीभाव अशा विविध मुद्यांवर आंबेडकर यांनी मुद्देसूद मांडणी केली. त्याचप्रमाणे इडी, सीबीआयची भीती घालून भाजप आणि आरएसएसचे सरकार विरोधी पक्षांना घाबरवण्याचे काम करीत आहे. पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. निवडणूक जशी जवळ येईल तसे हे प्रकार वाढतील, असेही आंबेडकर म्हणाले.


       
Tags: Mahaellagar sabhaMaharashtramaharashtrgovernmentPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadiwardha
Previous Post

वर्ध्यातील महासभेसाठी मैदान हाऊसफुल्ल

Next Post

सरकारची दडपशाही निवडणुकांपर्यंत आणखी वाढणार

Next Post
सरकारची दडपशाही निवडणुकांपर्यंत आणखी वाढणार

सरकारची दडपशाही निवडणुकांपर्यंत आणखी वाढणार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‎'रक्षकच भक्षक बनू नये', पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव
बातमी

‎’रक्षकच भक्षक बनू नये’, पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव

by mosami kewat
August 11, 2025
0

‎अकोला - वंचित बहुजन महिला आघाडीच्या अकोला जिल्हा शाखेने नुकताच रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. अकोला जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक...

Read moreDetails
‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो - प्रकाश आंबेडकर

‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो – प्रकाश आंबेडकर

August 11, 2025
मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट

August 11, 2025
'काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वरातीमागून घोडं अशी स्थिती ;‎'इंडिया' आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका

‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वरातीमागून घोडं अशी स्थिती ;‎’इंडिया’ आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका

August 11, 2025
‎अकोल्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक

‎अकोल्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक

August 11, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home