Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

आम्हाला सत्ता द्या, आम्ही हमीभावाचा कायदा करतो – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 19, 2024
in राजकीय
0
आम्हाला सत्ता द्या, आम्ही हमीभावाचा कायदा करतो – ॲड. प्रकाश आंबेडकर
0
SHARES
83
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

खोटारडे आणि फसवे राजकारणी ओळखा

वर्धा : आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचा कायदा केल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्धा येथील वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या महाएल्गार सभेत केले आहे.

हमीभावाचा कायदा करायला पाहिजे असे आमचे म्हणणे आहे, जेणेकरून या कायद्याचं उल्लंघन केले, तर त्या व्यापाऱ्यांवर कारवाई करता येईल असेही त्यांनी सांगितले.

जे खोटारडे आणि फसवे आहेत. त्यांच्या हातात पुन्हा पाच वर्षे सत्ता देता कामा नये, हे लक्षात घ्यायला पाहिजे. दिल्लीत शेतकरी आंदोलनाला बसला आहे. आज मजुरांची चर्चाच होताना दिसत नाही. शेतकरी इर्शेला पेटला आहे. कारण, हे लालांच सरकार आहे, या मुद्द्यांकडे लक्ष वेधत सध्याचे सरकार सामान्य माणसाचे नसल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली.

सभेला लाखो नागरिकांची गर्दी

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेसाठी वर्धा जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिक मोठ्या संख्येने आले होते. सभेपूर्वी मैदान भरगच्च भरले होते. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, शेतमालाला हमीभाव अशा विविध मुद्यांवर आंबेडकर यांनी मुद्देसूद मांडणी केली. त्याचप्रमाणे इडी, सीबीआयची भीती घालून भाजप आणि आरएसएसचे सरकार विरोधी पक्षांना घाबरवण्याचे काम करीत आहे. पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. निवडणूक जशी जवळ येईल तसे हे प्रकार वाढतील, असेही आंबेडकर म्हणाले.


       
Tags: Mahaellagar sabhaMaharashtramaharashtrgovernmentPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadiwardha
Previous Post

वर्ध्यातील महासभेसाठी मैदान हाऊसफुल्ल

Next Post

सरकारची दडपशाही निवडणुकांपर्यंत आणखी वाढणार

Next Post
सरकारची दडपशाही निवडणुकांपर्यंत आणखी वाढणार

सरकारची दडपशाही निवडणुकांपर्यंत आणखी वाढणार

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !
सामाजिक

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !

- आकाश मनीषा संतराम स्थळ परभणी. 10 डिसेंबर 2024. मंगळवारचा दिवस होता. पूर्वेला सूर्याची लाली आली होती. कुणी कामावर जाण्याच्या ...

February 15, 2025
सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !
विशेष

सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !

कालकथित सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले आहेत. ते ज्यावेळी कुर्ला येथे ...

February 15, 2025
शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!
विशेष

शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!

- आकाश मनिषा संतराम संपूर्ण जगभरात आजचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. विशेषतः तरुण ...

February 14, 2025
तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म
सामाजिक

तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म

प्रा. डॉ. गणेश बोरकर संत रोहीदास हिंदू नव्हते त्यांनी विज्ञानवादी रोहीदासीया समाजाची रचना केली आहे. ६२३ वर्षापूर्वी संत रोहीदासांनी मांडलेली ...

February 14, 2025
धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?
बातमी

धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?

सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा सवाल ! परभणी : सोमनाथच्या मारेकर्‍यांना माफ करा, असे आ.सुरेश धस साहेब तुम्ही कसे काय म्हणू शकता? ...

February 11, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क