Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वक्फ बोर्ड आणि औरंगाबाद महानगपालिकेच्या परीक्षांच्या तारखा बदला – सुजात आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 29, 2023
in बातमी
0
वक्फ बोर्ड आणि औरंगाबाद महानगपालिकेच्या परीक्षांच्या तारखा बदला – सुजात आंबेडकर
       

एकाच दिवशी परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना उपस्थित राहणे अशक्य !

औरंगाबाद : वक्फ बोर्ड परीक्षा आणि औरंगाबाद महानगरपालिका परीक्षेच्या यांच्या तारखा एकाच दिवशी आल्याने दोन्ही परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी बसू शकणार नाहीत. काही केंद्रे वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्हीसाठी उपस्थित राहणे अशक्य आहे. त्यामुळे कोणत्याही एका परीक्षेची तारीख बदलावी लागेल. असे ट्विटरच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, सुजात आंबेडकरांनी सांगितले आहे.

वक्फ बोर्ड व औरंगाबाद महानगर पालिकेच्या सरळ सेवा भरती परीक्षा जाहीर झाल्या असून त्याचे प्रवेशपत्र देखील प्रसिद्ध झाले आहे. याच पार्श्वभुमीवर सुजात आंबेडकरांनी ट्विट केले.

सदर दोन्ही विभागांच्या परीक्षा IBPS ह्या एकाच कंपनीमार्फत घेण्यात येत असून वक्फ बोर्डाची कनिष्ठ अभियंता(स्थापत्य )व औंरंगाबाद महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) या पदाच्या परीक्षांची तारीख ही तरतूद एकाच दिवशी म्हणजे ३ जानेवारी रोजी आहे आणि दोन्ही परीक्षांचा वेळ देखील एकच आहे.काही परीक्षार्थीचे परीक्षा केंद्र वेगवेगळ्या शहरात असल्याने परीक्षार्थीना दोनही विभागांच्या परीक्षांना उपस्थित राहणे शक्य होणार नाही.

विद्यार्थ्यांना देखील या निर्णयाचा त्रास सहन करावा लागत असल्याने, वक्फ बोर्ड व औंरंगाबाद महानगर पालिकेच्या सरळ सेवा भरती परीक्षा यापैकी एका विभागाची परीक्षेची तारीख व वेळ बदलण्यात यावी असे युवा नेते सुजात आंबेडकरांनी म्हटले.


       
Tags: Prakash AmbedkarSujat AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

भाजपच्या माजी खासदारावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची ‘वंचित’ ची मागणी !

Next Post

काँग्रेसच्या पोटातलं ओठात आलयं काय ? वंचित ने थेटचं विचारलं !

Next Post
काँग्रेसच्या पोटातलं ओठात आलयं काय ? वंचित ने थेटचं विचारलं !

काँग्रेसच्या पोटातलं ओठात आलयं काय ? वंचित ने थेटचं विचारलं !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोला जिल्ह्यात कृत्रिम पावसाची तांत्रिक शक्यता तपासा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बातमी

अकोला जिल्ह्यात कृत्रिम पावसाची तांत्रिक शक्यता तपासा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

by mosami kewat
September 2, 2026
0

अकोला : अकोला जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध हवामानविषयक...

Read moreDetails
पूल पडला की GDP कमी होतो का? – सुटेड-बुटेड अर्थशास्त्राला ‘जेन-झी’चा बिनधास्त सवाल!

पूल पडला की GDP कमी होतो का? – सुटेड-बुटेड अर्थशास्त्राला ‘जेन-झी’चा बिनधास्त सवाल!

September 2, 2026
आरक्षणावर हल्ला म्हणजे न्यायावर हल्ला !  ॲड. प्रकाश आंबेडकर 

आरक्षणावर हल्ला म्हणजे न्यायावर हल्ला !  ॲड. प्रकाश आंबेडकर 

September 2, 2026
बालमटाकळीत वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; सर्व समाजातील तरुणांचा मोठा सहभाग

बालमटाकळीत वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; सर्व समाजातील तरुणांचा मोठा सहभाग

September 2, 2026
दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे

दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे

September 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home