Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पातूर तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेत भ्रष्टाचार; जिल्हा परिषदेवर महिलांचा घागर मोर्चा

mosami kewat by mosami kewat
August 8, 2025
in बातमी
0
पातूर तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेत भ्रष्टाचार; जिल्हा परिषदेवर महिलांचा घागर मोर्चा

पातूर तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेत भ्रष्टाचार; जिल्हा परिषदेवर महिलांचा घागर मोर्चा

       

अकोला : पातूर तालुक्यातील भंडारज बु. (ता. पातूर) येथील जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत गावातील महिला व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) घागर मोर्चा काढून तक्रार दाखल केली आहे. योजना पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवून लाखो रुपये खर्च झाले असतानाही, गावकऱ्यांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. या योजनेतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची आणि गावात तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
‎
‎नेमकं काय आहे प्रकरण?
‎
‎२०२२ मध्ये भंडारज बु. येथे जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. कंत्राटदार श्याम माहोरे यांनी या योजनेचे ९८ टक्के काम पूर्ण केल्याचा अहवाल पाणीपुरवठा विभागाने दिला असून, त्यासाठी ४८.७३ लाख रुपये खर्च झाल्याचं नमूद आहे. मूळ योजनेचा उद्देश प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचवणे हा होता.
‎
‎मात्र, जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता मिलिंद जाधव, त्यांच्या नेमणुकीचे खासगी पर्यवेक्षक, तसेच ‘वायकॉम’ कंपनी आणि कंत्राटदार श्याम माहोरे यांनी संगनमत करून या कामात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ही योजना केवळ कागदावरच पूर्ण झाली असून, गावकऱ्यांना ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
‎
‎मुख्य पाईपलाईन अस्तित्वात नसतानाही जोडणीचा बनावट अहवाल
‎
‎ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, देऊळगाव आस्टूल येथून येणाऱ्या मुख्य पाईपलाईनला शिर्ला फाट्याजवळ जोडणी करून पाणीपुरवठा सुरू केल्याचा खोटा अहवाल तयार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात, ही मुख्य पाईपलाईन अकोला-हैदराबाद महामार्गाच्या कामादरम्यान तोडून काढण्यात आली होती. यासंदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने स्वतः पातूर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. तरीही, अस्तित्वात नसलेल्या पाईपलाईनची जोडणी दाखवून बनावट नोंदी तयार करण्यात आल्या आहेत.
‎
‎योजनेचा लाखो रुपये खर्च झाला असला तरी, गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जल जीवन मिशनचा उद्देश प्रत्येक कुटुंबाला दररोज ५५ लिटर सुरक्षित पाणी देणे हा होता. मात्र, भ्रष्टाचारामुळे हा उद्देश सफल झाला नाही, ज्यामुळे महिलांचा श्रम आणि वेळ वाया जात आहे.
‎
‎यावेळी युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, तालुका अध्यक्ष सम्राट तायडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, मंगला इंगळे,रूपाली इंगळे, मयुरी वानखडे,आशा सुरवाडे, जयश्री करवते, स्मिता हातोले, परमिला सुरवाडे, ललिता सरबोल,अरुणा सुरवाडे, सोनू खंडारे, राजकन्या सुरवाडे, दिपाली बोरकर,मंगला बोरकर, सविता सुरवाडे, अंकुश शेंडे, अजय इंगळे, संदेश करवते, प्रदीप सुरवाडे, श्रीकांत सुरवाडे, राहुल सुरवाडे,

निर्भ इंगळे,आकाश खंडारे, नंदकिशोर सुरवाडे, आशिष इंगळे, संघपाल इंगळे, नंदू सुरवाडे, निलेश इंगळे,जयसन वानखडे, बंडू इंगळे, सोनू मोहोळ, प्रकाश इंगळे,बाबुराव इंगळे,प्रशांत गवई,पिंटू इंगळे, शैलेश बोरकर, रत्नदीप सुरवाडे, प्रतीक इंगळे, सोनू खंडेराव, आदित्य खंडारे, सुधाकर तेलगोटे,बबन इंगळे, उज्वला इंगळे,विजया सुरवाडे, मायावती सुरवाडे ग्रामस्थ उपस्थित होते. यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ तक्रार देण्यासाठी उपस्थित होते. ‎ग्रामस्थांनी या प्रकरणाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची आणि दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.


       
Tags: AkolaBhandarajJal Jeevan MissionMission water supply schemeprotest
Previous Post

Maharashtra Assembly election 2024 : महाराष्ट्र निवडणुकीतील 76 लाख मतवाढ प्रकरणी विरोधकांनी सहभागी व्हा

Next Post

शासकीय दौऱ्यादरम्यान दुबईमध्ये शरद पवार यांची दाऊदसोबत भेट झाली होती का, याचा खुलासा शरद पवार यांनी करावा – सिद्धार्थ मोकळे

Next Post
शासकीय दौऱ्यादरम्यान दुबईमध्ये शरद पवार यांची दाऊदसोबत भेट झाली होती का, याचा खुलासा शरद पवार यांनी करावा - सिद्धार्थ मोकळे

शासकीय दौऱ्यादरम्यान दुबईमध्ये शरद पवार यांची दाऊदसोबत भेट झाली होती का, याचा खुलासा शरद पवार यांनी करावा - सिद्धार्थ मोकळे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात
बातमी

जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात

by mosami kewat
March 16, 2026
0

मुंबई : पवई येथील जय भीम नगर परिसरातील बुद्ध विहारावर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येत असताना वंचित...

Read moreDetails
गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

March 16, 2026
पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

March 16, 2026
मोदी - एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

मोदी – एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

March 16, 2026
एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर - ॲड. प्रकाश आंबेडकर

एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home