Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home सामाजिक

गोष्टीच्या पलीकडे

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
August 29, 2022
in सामाजिक
0
गोष्टीच्या पलीकडे
       

“ओवी ट्रस्ट” ही संस्था महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आदिवासी आणि भटके-विमुक्तांच्या शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी कार्य करते. वंचित समूहातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व हा समाज मुख्य प्रवाहात यावा हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. यवतमाळ येथील धनगरवाडी (मेंढला) या गावात स्थलांतरित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी ‘बालनगरी’ हे मुक्त शिक्षणकेंद्र ओवी संस्थेमार्फत जुलै २०२० पासून सुरू आहे.

बालनगरीमध्ये मुलांसाठी गोष्टींचं प्रकट वाचन, सहभागी वाचन केलं जातं. मुलांसमोर वेगवेगळ्या आशयाची पुस्तकं वाचली जातात. वाचनानंतर त्या पुस्तकांवर चर्चा होते, तेव्हा मुलंही त्यांच्या भावविश्वातल्या गोष्टी सांगतात.

एक दिवस मी मुलांना ‘पिहू आणि तिचे जादूई मित्र’ हे पुस्तक वाचून दाखवत होते. पुस्तकातली पिहूची जादूई पेटी, त्यात असलेल्या रंगीबेरंगी पेन्सिली, खोडरबर आणि त्यांची जादू; मुलं अगदी रंगून गेली. गोष्टीतली पिहू हवं ते पेन्सिलीनं निर्माण करते आणि नको ते खोडरबरानं नष्ट करते, पुरात वाहून गेलेल्या गावाला नव्यानं वसवते अशी काहीशी ही गोष्ट आहे. 

गोष्ट वाचून झाल्यावर मी मुलांना विचारलं, ‘‘तुम्हाला अशी जादूची पेटी मिळाली, तर काय कराल?’’

मुलं एक एक करून सांगू लागली. हर्षा म्हणाला, ‘‘आपल्या बालनगरीमध्ये सर्वांना बसायला पुरेशी जागा नाही. लहान मुलांना सारखं बाहेर, उघड्यावर, उन्हातान्हात बसावं लागतं. त्यांच्यासाठी मी एक रूम (खोली) बांधेन.’’

दीपक म्हणाला, ‘‘मी आपल्या बालनगरीला रंगवून नव्यासारखं बनवेल.’’

अंजना म्हणाली, ‘‘बालनगरीमध्ये लाईट, फॅनची सोय नाही. मी लाईट फॅन काढेल.’’

वैष्णवी म्हणाली. ‘‘ताई-दादा, तुम्ही आमच्यासोबत जमिनीवर बसता. आमच्या शाळेत गुरुजींना टेबल-खुर्ची असते. मी सगळ्यांसाठी टेबल-खुर्ची तयार करेन.’’

सोपान म्हणाला, ‘‘आपले साहित्य आणि खेळणी ठेवायला मी कपाट बनवेन.’’

तर सोनू म्हणाली, ‘‘मी मोठा फळा तयार करेन.’’

कुणी म्हणालं, ‘आपलं गाव नवं करू. पाणी, लाईट, रस्ते, घरं; सगळं छान करू आणि त्यापेक्षाही बालनगरीमध्ये मोठी इमारत, सर्वांना राहण्यासाठी होस्टेल आणि खेळायला ग्राउंड करू.’

मुलं किती बारकाईनं आजूबाजूच्या परिस्थितीकडे बघतात, आपल्या सोबतच्या लहान गटातल्या मुलांबद्दल त्यांना वाटणारी काळजी, परिस्थितीची जाणीव, आपल्या सामुदायिक गरजा, भविष्यवेधी दृष्टी – ह्या सार्‍यानं मी खूप भारावून गेले. आम्हाला प्रश्न पडला, की या चिमुकल्यांना हे कुणी सांगितलं असेल? आम्ही तर यावर कधी बोललोसुद्धा नाही. मिळेल त्या परिस्थितीमध्ये मुलांना फक्त शिकवत गेलो. त्यांचा सर्वसमावेशक विचार आणि संवेदनशील दृष्टिकोन मला खूप ऊर्जा देऊन गेला.

प्रणाली – धम्मानंद (ओवी ट्रस्ट, यवतमाळ)
मो – ९००४१३५२५०


       
Tags: BalnagariOvi TrustYavatmal
Previous Post

“अंधे जहाँ के अंधे रास्ते” – घाणीच्या मलब्यात अडकलेल्या मरणप्राय जगण्याची कथा

Next Post

वंचित बहुजन युवा आघाडीने समाज कल्याण आयुक्तालयाचे केले नामकरण !

Next Post
वंचित बहुजन युवा आघाडीने समाज कल्याण आयुक्तालयाचे केले नामकरण !

वंचित बहुजन युवा आघाडीने समाज कल्याण आयुक्तालयाचे केले नामकरण !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मोठी बातमी: माणिकराव कोकाटेंची खाती काढून घेतली; जबाबदारी अजित पवारांकडे, मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांची मोहोर!
बातमी

मोठी बातमी: माणिकराव कोकाटेंची खाती काढून घेतली; जबाबदारी अजित पवारांकडे, मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांची मोहोर!

by mosami kewat
December 17, 2025
0

मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील महत्त्वाचे फेरबदल करत माणिकराव कोकाटे...

Read moreDetails
Aurangabad: नारेगाव येथील कब्रिस्तानच्या जागेसाठी मनपा कार्यालयासमोर आंदोलन तीव्र

Aurangabad: नारेगाव येथील कब्रिस्तानच्या जागेसाठी मनपा कार्यालयासमोर आंदोलन तीव्र

December 17, 2025
भाजपचा मनसुबा लोकशाही संपवण्याचा! ५ हजार रुपयांसाठी लोकशाही स्मशानात नेणार का? – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल

भाजपचा मनसुबा लोकशाही संपवण्याचा! ५ हजार रुपयांसाठी लोकशाही स्मशानात नेणार का? – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल

December 17, 2025
शेतकऱ्याचा ‘किडनी’ विक्रीचा टाहो; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार, ‘मतदानाचा पॅटर्न बदलण्याचे’ शेतकऱ्यांना आवाहन

शेतकऱ्याचा ‘किडनी’ विक्रीचा टाहो; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार, ‘मतदानाचा पॅटर्न बदलण्याचे’ शेतकऱ्यांना आवाहन

December 17, 2025
“द्वि अक्षी” सार्वजनिक चर्चा विश्व : एक सापळा!

“द्वि अक्षी” सार्वजनिक चर्चा विश्व : एक सापळा!

December 17, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home