Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बार्टीच्या लढ्याला यश ; बाळासाहेब आंबेडकरांच्या घोषणेनंतर राज्य सरकार बॅकफूटवर !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 13, 2023
in बातमी
0
बार्टीच्या लढ्याला यश ; बाळासाहेब आंबेडकरांच्या घोषणेनंतर राज्य सरकार बॅकफूटवर !
       

सरकारचे ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचे जाहीर

मुंबई – गेल्या ५२ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आले आहे. सरकारने सरसकट ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप जाहीर केली आहे. यावेळी बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पी.एचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

या आंदोलनात सुरुवातपासूनच वंचित बहुजन युवा आघाडीने सक्रिय सहभाग घेतला होता. वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोकभाऊ सोनोने, वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य महासचिव राजेंद्र पातोडे यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन आरपारची लढाई लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली होती.
या आंदोलना दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दोन वेळा चर्चा केली होती. तेव्हा सरकारने सकारात्मक पवित्रा घेत “आम्ही मागण्या मान्य करू” असं सांगितले होते.

आंदोलनास्थळी भेट देऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्या आमदारांमुळे फेलोशिप रोखली आहे, त्यांना एकदा हाताखालून काढा…असा आक्रमक पवित्रा घेतला. विद्यार्थ्यांनी आंदोलनची दिशा आक्रमक ठेवत विद्यार्थ्यांना थेट मुळावर घाव घालण्याचे सांगितले. ह्या नंतर संध्याकाळी तातडीने मुख्यमंत्री शिंदे विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला भेटले व फेलोशिपचा प्रश्न मान्य करत असल्याचे जाहीर केले. यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


       
Tags: BARTIFELLOWSHIPMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये ऐतिहासिक कोनशीला काढून नेणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करा; वंचित युवा आघाडीने केली मागणी.

Next Post

वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने अकोला येथे भव्य युवा अभिवादन रॅली

Next Post
वंचित बहुजन युवा  आघाडीच्या वतीने अकोला येथे भव्य युवा अभिवादन रॅली

वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने अकोला येथे भव्य युवा अभिवादन रॅली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा
बातमी

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

by mosami kewat
August 16, 2026
0

मुंबई : वरळी येथील माता रमाई आंबेडकर स्मशानभूमीतील अपुऱ्या व बंद सुविधांसह विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी...

Read moreDetails
अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

August 16, 2026
कांदिवलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘ज्येष्ठ नागरिक व नाका कामगार कट्टा’चे अनावरण

कांदिवलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘ज्येष्ठ नागरिक व नाका कामगार कट्टा’चे अनावरण

August 16, 2026
कावड मार्ग उजळला; निलेश देव यांच्या पाठपुराव्याला यश!

कावड मार्ग उजळला; निलेश देव यांच्या पाठपुराव्याला यश!

August 16, 2026
लोकांचा, लोकांसाठी लिहिणारा गायक- कवी: वामनदादा

लोकांचा, लोकांसाठी लिहिणारा गायक- कवी: वामनदादा

August 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home