Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बार्टीच्या लढ्याला यश ; बाळासाहेब आंबेडकरांच्या घोषणेनंतर राज्य सरकार बॅकफूटवर !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 13, 2023
in बातमी
0
बार्टीच्या लढ्याला यश ; बाळासाहेब आंबेडकरांच्या घोषणेनंतर राज्य सरकार बॅकफूटवर !
       

सरकारचे ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचे जाहीर

मुंबई – गेल्या ५२ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आले आहे. सरकारने सरसकट ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप जाहीर केली आहे. यावेळी बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पी.एचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

या आंदोलनात सुरुवातपासूनच वंचित बहुजन युवा आघाडीने सक्रिय सहभाग घेतला होता. वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोकभाऊ सोनोने, वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य महासचिव राजेंद्र पातोडे यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन आरपारची लढाई लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली होती.
या आंदोलना दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दोन वेळा चर्चा केली होती. तेव्हा सरकारने सकारात्मक पवित्रा घेत “आम्ही मागण्या मान्य करू” असं सांगितले होते.

आंदोलनास्थळी भेट देऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्या आमदारांमुळे फेलोशिप रोखली आहे, त्यांना एकदा हाताखालून काढा…असा आक्रमक पवित्रा घेतला. विद्यार्थ्यांनी आंदोलनची दिशा आक्रमक ठेवत विद्यार्थ्यांना थेट मुळावर घाव घालण्याचे सांगितले. ह्या नंतर संध्याकाळी तातडीने मुख्यमंत्री शिंदे विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला भेटले व फेलोशिपचा प्रश्न मान्य करत असल्याचे जाहीर केले. यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


       
Tags: BARTIFELLOWSHIPMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये ऐतिहासिक कोनशीला काढून नेणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करा; वंचित युवा आघाडीने केली मागणी.

Next Post

वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने अकोला येथे भव्य युवा अभिवादन रॅली

Next Post
वंचित बहुजन युवा  आघाडीच्या वतीने अकोला येथे भव्य युवा अभिवादन रॅली

वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने अकोला येथे भव्य युवा अभिवादन रॅली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गुजरातमध्ये गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे 30 लाख मजूर परतले आपल्या गावी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारच्या कारभारावर संताप!
बातमी

गुजरातमध्ये गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे 30 लाख मजूर परतले आपल्या गावी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारच्या कारभारावर संताप!

by mosami kewat
April 20, 2026
0

गुजरात : गुजरातमधील सुरत येथे काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांची अत्यंत गंभीर स्थिती समोर येत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; सेवली सर्कलसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नियुक्त

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; सेवली सर्कलसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नियुक्त

April 19, 2026
शिरड शहापूर येथे २ तास ‘रास्ता रोको’ आंदोलन; भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

शिरड शहापूर येथे २ तास ‘रास्ता रोको’ आंदोलन; भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 19, 2026
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नको; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नको; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 19, 2026
‘अंतरीचे दीप’ ला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

‘अंतरीचे दीप’ ला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

April 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home