बीड : पाटोदा तालुक्यातील विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाटोदा येथे हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष अजय सरोदे यांनी केले. या मोर्चात तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम वीर, सचिन मेघडंबर, भारत तांगडे, अंकुश जाधव, शिरूर तालुका अध्यक्ष दिलीप माने, तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या यशस्वी मोर्चाच्या आयोजनाबद्दल पाटोदा तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांचे अभिनंदन करण्यात आले. या मोर्चाद्वारे वंचित बहुजन आघाडीने पाटोदा तालुक्यातील जनतेच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.
पुस्तक परीक्षण -जीवन चलने का नाम
मनुष्य आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आयुष्यभर पळत असतो. या धावपळीच्या जीवनामध्ये जणू काही तो स्वतःला विसरून जातो, आपल्याला काय आवडतं?...
Read moreDetails