Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

तब्बल 32 वर्षांनी साताऱ्यात होणाार 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 9, 2025
in बातमी
0
तब्बल 32 वर्षांनी साताऱ्यात होणाार 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
       

सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल 32 वर्षांनंतर साताऱ्यात भरणार असल्याची माहिती प्रा मिलिंद जोशी यांनी दिली. पुणे येथे झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. 99 वे संमेलन आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला मिळणार आहे.

साताऱ्यात होणारे हे चौथे साहित्य संमेलन असून हे 99 वे साहित्य संमेलन सातारच्या शाहू स्टेडीअमवर होणार आहे. हे स्टेडियम 14 एकरात असून तिथे मुख्य मंडप, 2 इतर मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर छोटे कार्यक्रम करण्यासाठी 3 सभागृहे उपलब्ध आहेत. स्टेडियममध्ये 25,000 प्रेक्षक क्षमताअसलेली गॅलरी आहे. तसेच हे स्टेडियम बसस्टॅंड जवळ आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी यंदा 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “साताऱ्याला 32 वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळालाय .यापूर्वी 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात संमेलन झाले होते. गेल्या बारा वर्षांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी पाठपुरावा करत होती . “


       
Tags: 32 years99thafterAll IndiaConferenceheldLiteratureMarathiSatara
Previous Post

मणिपूरात पुन्हा हिंसाचार, 5 जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

Next Post

समृद्ध लोकशाही उभारण्यासाठी ॲड.प्रकाश आंबेडकरांचा सामाजिक अभिसरणाचा प्रयोग – भास्कर भोजने

Next Post
समृद्ध लोकशाही उभारण्यासाठी ॲड.प्रकाश आंबेडकरांचा सामाजिक अभिसरणाचा प्रयोग – भास्कर भोजने

समृद्ध लोकशाही उभारण्यासाठी ॲड.प्रकाश आंबेडकरांचा सामाजिक अभिसरणाचा प्रयोग - भास्कर भोजने

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आमदार-खासदार मंत्री झाले की सर्वज्ञच बनतात!
Uncategorized

आमदार-खासदार मंत्री झाले की सर्वज्ञच बनतात!

by mosami kewat
July 29, 2025
0

राष्ट्रीय ष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजप आणि त्यांच्या मागच्या दारातील पक्ष वगळून बाकी साऱ्या पक्षांनी नुकतेच मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था,...

Read moreDetails
मुंबई-गोवा महामार्गावर 10 तास वाहतूक ठप्प: एलपीजी टँकर उलटल्याने प्रवाशांचे हाल

मुंबई-गोवा महामार्गावर 10 तास वाहतूक ठप्प: एलपीजी टँकर उलटल्याने प्रवाशांचे हाल

July 29, 2025
महाराष्ट्रात पावसाचा जोर घटणार; विदर्भात मात्र 'यलो अलर्ट' कायम!

महाराष्ट्रात पावसाचा जोर घटणार; विदर्भात मात्र ‘यलो अलर्ट’ कायम!

July 29, 2025
देवघरमध्ये भीषण अपघात: १९ कावडियांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

देवघरमध्ये भीषण अपघात: १९ कावडियांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

July 29, 2025
मंगळवेढ्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारिणीसाठी मुलाखती; अनेक तरुणांचा पक्षात प्रवेश

मंगळवेढ्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारिणीसाठी मुलाखती; अनेक तरुणांचा पक्षात प्रवेश

July 29, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home