Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

डिसेंबर 2025 अखेरपर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 9, 2025
in बातमी
0
डिसेंबर 2025 अखेरपर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर
       

पुणे : डिसेंबर 2025 अखेरपर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात प्रधानमंत्री सूर्य घर योजना देखील प्रभावीपणे राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते पार पडले. यावेळी महाऊर्जासाठी दोन उद्दिष्टे महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याला गती देणार, तसेच प्रधानमंत्री सुर्यघर योजनेप्रमाणे त्या योजनेशी संलग्न असलेली राज्याची योजना सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये पहिल्या टप्प्यात 100 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक तर दुसऱ्या टप्प्यात 300 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक सौर ऊर्जेवर आणायचे आहेत. 300 युनिटपर्यंत वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीज देयक शून्यावर यावे, असा प्रयत्न आहे. ही दोन्ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासंदर्भात महाऊर्जा हे काम चांगल्यारितीने करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सौर ऊर्जेच्या वापरामुळे वीजेचे दर कमी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाऊर्जाने गेल्या काही वर्षात अपारंपरिक ऊर्जा निर्माण करण्यात चांगली कामगिरी केली आहे. 2026 च्या डिसेंबरपर्यंत कृषी क्षेत्राची संपूर्ण वीज मागणी सौर ऊर्जेवर परिवर्तित करू शकू. गेल्या 20 वर्षात दरवर्षी वीजेचे दर 9 टक्क्याने वाढवत आहोत. मात्र 2025 ते 2030 या कालावधीमध्ये दरवर्षी वीजेचे दर कमी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


       
Tags: allDecember 2025endenergygovernmentMaharashtraofficessolarstateusing
Previous Post

बंगळुरू पोलिस आयुक्तांसह अनेक पोलिस अधिकारी निलंबित, आरसीबीच्या कंपनीविरोधात गुन्हा, कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा

Next Post

राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार

Next Post
राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार

राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज
अर्थ विषयक

केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

by mosami kewat
July 28, 2026
0

- संजीव चांदोरकर जेन झी आंदोलनाच्या निमित्ताने !(मी कॉलेजमध्ये शिकवत असताना विद्यार्थ्यांबरोबर झालेल्या संवादावर आधारित एक जुनी पोस्ट ) “कोणताही...

Read moreDetails
कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

July 28, 2026
आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात

आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात

July 27, 2026
MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी

MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी

July 27, 2026
नांदेड: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे वॉटर फिल्टर भेट

नांदेड: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे वॉटर फिल्टर भेट

July 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home