Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा यासाठी ‘वंचित’ चे पंतप्रधान मोदींना निवेदन

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 23, 2024
in बातमी
0
शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा यासाठी ‘वंचित’ चे पंतप्रधान मोदींना निवेदन
0
SHARES
51
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनास वंचितचा पाठिंबा !

गडचिरोली: भारतातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान हमीभाव मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. पंतप्रधान मोदी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजधानी दिल्लीमध्ये परत एकदा देशातील शेतकऱ्यांनी न्याय मागण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे, या आंदोलक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे ती “किमान आधारभूत किंमत” हा त्यांचा हक्क मानला जावून ती देण्यास सरकार बांधील आहे असा कायदा केला जावा.

परंतु सरकारला हे मान्य नाही त्यामूळे देशात किमान हमीभाव मिळावा यासाठी तिव्र आंदोलन सुरू आहे, देशातील फक्त सहा टक्के शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळतो हे विदारक सत्य असून आडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे प्रचंड शोषण होत आहे. केंद्र सरकारने आणि त्याच्या नेतृत्वातील महाराष्ट्र राज्य सरकारने आणलेल्या कृषी कायद्यामूळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार समित्यां बाहेर विकता येणार आहे, पण जर शेतकरी हा शेतमाल बाजार समित्यांबाहेर विकणार असेल तर तिथं त्या मालाची खरेदी सरकारी भावानं होईल याची हमी नाही, किमान हमी भावाचा मुद्दा हा एपीएमसी कायद्यात ज्या तिन दुरूस्त्या केल्या त्याच्याशी निगडीत आहे या तिन्ही कायद्यामूळे शेतकऱ्यांसमोर धोके निर्माण झाले आहेत.

शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळावा आणि त्या हमी भावाची कडक अमंलबजावणी होण्याच्या दृष्टीने ज्या एपीएमसीच्या आवारात हमीभावापेक्षा कमी किंमतीने खरेदी होईल त्या मार्केट कमिटीच्या संचालका विरूध्द कायदेशीर कारवाई करावी, तसेच व्यापारी अथवा अडत्या दोषी असल्यास त्यांना तुरूंगवास व आर्थिक दंड करावा आणि त्यासाठी कायदा तयार करावा अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचेही म्हटले आहे.

यावेळी, जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, सोशल मिडीया प्रमुख जावेद शेख, युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कवडू दुधे, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, शहर संगटक विपीन सूर्यवंशी, वासूदेव मडावी, किशोर जाधव, कैलास खोब्रागडे आदि उपस्थित होते.


       
Tags: FarmerfarmersprotestGadchiroliVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मालेगावा तालुक्यात ‘वंचित’ च्या ग्रामशाखेचे उद्घाटन !

Next Post

‘मविआ’ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
‘मविआ’ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा – ॲड. प्रकाश आंबेडकर

'मविआ'ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा - ॲड. प्रकाश आंबेडकर

Vikhroli bridge: विक्रोळीतील ६६ कोटींचा उड्डाणपूल ठरतोय डोकेदुखी; वंचित कडून उपाययोजना करण्याची मागणी ‎ ‎
बातमी

Vikhroli bridge: विक्रोळीतील ६६ कोटींचा उड्डाणपूल ठरतोय डोकेदुखी; वंचित कडून उपाययोजना करण्याची मागणी ‎ ‎

‎मुंबई: विक्रोळी येथील ६६ कोटी रुपये खर्चून सात वर्षांपूर्वी उभारलेला उड्डाणपूल आता वाहतूक कोंडीचे कारण ठरत आहे. यामुळे करत वंचित ...

June 28, 2025
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक
बातमी

Jalna : लोणीकरांच्या फोटोला मारले जोडे!

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमकजालना : शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याप्रकरणी आमदार बबनराव लोणीकर जोपर्यंत नम्रपणे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना परतुर-मंठा ...

June 28, 2025
मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल
बातमी

Dombivli : मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल

डोंबिवली : डोंबिवली शहरातील मोठागाव येथे कार आणि रिक्षाच्या धडकेतून झालेल्या वादानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कार ...

June 28, 2025
महाबुद्ध विहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप
बातमी

महाबोधी महाविहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप

‎ ‎मुंबई : चेंबूर येथील फुलेनगरमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकडे प्रमुख राजकीय पक्षांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आंबेडकरी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त ...

June 28, 2025
खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: 'वंचित' रस्त्यावर उतरणार! ‎
बातमी

खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: ‘वंचित’ रस्त्यावर उतरणार! ‎

मुंबई : राज्यात अदानी आणि टोरंट या कंपन्यांकडून अनेक शहरांमध्ये वीज वितरणासाठी परवान्यांचे अर्ज करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, वंचित ...

June 28, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क