Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्यास काँग्रेस नेते नाना पटोले यांचा विरोध !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 20, 2024
in राजकीय
0
वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्यास काँग्रेस नेते नाना पटोले यांचा विरोध !
       

ऑल इंडिया मिल्ली कौन्सिलच्या बैठकीतील सुत्रांची प्रबुद्ध भारताला माहिती !

मुंबई – ऑल इंडिया मिल्ली कौन्सिलची मिटिंग नुकतीच 16 जानेवारी रोजी मुंबईत पार पडली. या बैठकीतील खात्रीलायक सूत्रांनी प्रबुद्ध भारताला माहिती दिली आहे की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही मुस्लिम नेत्यांशी बोलतांना सांगितले की, वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीत समावेश केला जाणार नाही.

गेल्या 3 आठवड्यातील हा दुसरा प्रसंग आहे की, नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीला आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत घेतले असे भाष्य केले आहे.

गेल्या डिसेंम्बर महिन्यात नागपुरातील महाराष्ट्रातील दोन वरीष्ठ पत्रकारांचे खाजगीमधील व्हाट्सअप्प वरील संभाषण व्हायरल झाले होते. त्यावेळी नागपुरात ‘हे तयार हम’ या सभेच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी ह्याच विधानाचा पुनरुच्चार केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणातील धक्कादायक घटना मानली जात आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर हे सातत्याने भाजप- आरएसएसचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडी, महाविकास आघाडीत समावेश करण्याचं आवाहन करत आहेत. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने 4 पत्र काँग्रेस पक्षाला दिले आहेत.

१ सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, २४ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी, २८ डिसेंम्बर रोजी मल्लिकार्जुन खर्गे आणि ह्याच वर्षी १६ जानेवारी रोजी राहुल गांधी यांना पत्र. यातील ३ पत्र स्वतः वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहले आहेत. त्यांचे आवाहन असूनही इंडिया आघाडी, महाविकास आघाडीत ‘वंचित’चा समावेश अजून झालेला नाहीये.

महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी मोठी ताकद राखून आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४० लाख मतदान वंचित बहुजन आघाडीला मिळाले होते. महाराष्ट्रातील लहान-लहान जाती समूह यांचा बुलंद आवाज म्हणून उभा आहे. आज राज्यभरात वंचित बहुजन आघाडीला मुस्लिम, ओबीसी, गरीब मराठा, दलित आणि आदिवासींचा मोठा पाठिंबा आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने कोणत्याही पक्षांसोबत युती न केल्यामुळे भाजपचा पराभव करण्यास ते मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये अपयशी ठरले आहेत आणि महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा 0 खासदार आहे.

वंचित बहुजन आघाडी आपल्या बाजूने इंडिया आघाडीत येण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्ष शिवसेनेसोबत एकत्र आले नाही तर वंचित – शिवसेना 50 टक्के जागा वाटून घेणार आणि सर्व जण एकत्र सोबत आले तर महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी 12+12+12+12 जागा लढवाव्यात असा फॉर्म्युला सुद्धा देण्यात आला होता.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी भाष्य केले होते की, जर इंडिया आघाडी, महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश नाही झाला, तर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना 24-24 लोकसभा जागांवर निवडणूक लढेल.


       
Tags: CongressNana PatolePrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पवनी येथील संघर्ष समितीच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा !

Next Post

‘वंचित’ ची विराट सभा की, विजयी सभा ?

Next Post
‘वंचित’ ची विराट सभा की, विजयी सभा ?

'वंचित' ची विराट सभा की, विजयी सभा ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप
बातमी

सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप

by mosami kewat
March 12, 2026
0

सातारा : दहावी आणि बारावीच्या पेपरफुटीच्या बातम्या अधूनमधून समोर येत असतात. मात्र आता सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर...

Read moreDetails
OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

March 12, 2026
Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

March 12, 2026
खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

March 12, 2026
इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा "चिकन आऊट" होतील काय ?

इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा “चिकन आऊट” होतील काय ?

March 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home