सोलापूर : मंडल आयोग विजय दिनानिमित्त ७ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर शहर व जिल्हा शाखेच्या वतीने सामाजिक न्याय व समतेचा संदेश देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ओबीसी समाजबांधवांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अर्थात RPI (A)च्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या निर्देशानुसार राज्यभर ७ ऑगस्ट हा ‘मंडल आयोग विजय दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. त्यानुसार सोलापुरात आयोजित चर्चासत्रामध्ये मंडल आयोगाचे सामाजिक न्यायासाठीचे योगदान, ओबीसी समाजाच्या हक्कांबाबत जनजागृती आणि संघटन बळकटीवर चर्चा करण्यात आली.
यावेळी स्वामी ताई, मल्लिकार्जुन हिरेमठ, शाहिद शेख, अतिश भैय्या बनसोडे, शहराध्यक्ष प्रशांत गोनेवार, शहर महासचिव विनोद इंगळे, शरीफ शेख, युवक शहराध्यक्ष महेश जाधव, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष सुरेश देशमुख, जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, विजय दादा उघडे आणि जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या औचित्य साधून RPI (A) दक्षिण सोलापूरचे उमाकांत बाबू येरवडे (माजी सरपंच), तालुका उपाध्यक्ष गणेश विक्रम कांबळे, सतीश आंबा येरवडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाला अक्कलकोट तालुकाध्यक्ष विशाल ठोंबरे, यशवंत शेठ इंगळे, रोहित दादा थोरात, युवक आघाडीचे तालुका उपाध्यक्ष अमर डोरके, राहुल शिंदे, विजय गायकवाड, सिताफळे, गौतम थापटे, श्रीनिवास संगेपान, सुहास दादा सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






