मुंबई : दिल्लीमध्ये मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले असून देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालपदांवर नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदेशानंतर या बदलांना अधिकृत मान्यता देण्यात आली.
या फेरबदलांमध्ये महाराष्ट्रालाही नवीन राज्यपाल मिळाले आहेत. जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. मूळचे त्रिपुरा येथील असलेले जिष्णू देव वर्मा आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळतील. त्यांच्या नियुक्तीनंतर तेलंगणाच्या राज्यपालपदी शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, इतर राज्यांमध्येही राज्यपालपदावर बदल करण्यात आले आहेत. नागालँडच्या राज्यपालपदी नंद किशोर यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांना बिहारचे राज्यपाल म्हणून नेमण्यात आले आहे.
तामिळनाडूचे विद्यमान राज्यपाल आर. एन. रवी यांना पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. केरळचे राज्यपाल राजेंद्र अरळेकर यांच्याकडे हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
याशिवाय, लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल वी. कुमार सक्सेना यांना लडाखचे उपराज्यपाल म्हणून नेमण्यात आले असून तरनजीत सिंह सिंधू हे दिल्लीचे नवे उपराज्यपाल असतील.






