Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पंचायत समितीवर मोर्चा; गटविकास अधिकाऱ्यांसमोर नोटिसांची होळी, वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक!

mosami kewat by mosami kewat
February 5, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पंचायत समितीवर मोर्चा; गटविकास अधिकाऱ्यांसमोर नोटिसांची होळी, वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक!
       

जळगाव : भुसावळ तालुक्यातील फेकरी गावातील अतिक्रमण कारवाईचा प्रश्न चिघळला असून ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी आज पंचायत समितीवर धडक मोर्चा काढत गटविकास अधिकाऱ्यांसमोर ग्राम पंचायतीकडून देण्यात आलेल्या अतिक्रमण नोटिसांची होळी करून संताप व्यक्त केला.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, फेकरी गावातील सर्वे नंबर २ मध्ये गेल्या ३० ते ४० वर्षांपासून शेकडो कुटुंबे वास्तव्यास आहेत. या वस्तीत सर्व धर्मीय समाज बांधव राहत असून ही वस्ती अनेक वर्षांपासून स्थिर आहे. २०२० साली ग्रामपंचायतीकडून संबंधित रहिवाशांना नमुना ८/१२ भोगवटा उताऱ्यांचे वाटप देखील करण्यात आले होते. (Vanchit bahujan aghadi)

तथापि, त्यानंतरही सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून अतिक्रमणाच्या नावाखाली वारंवार नोटिसा बजावण्यास सुरुवात केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या कारवाईमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कारवाई राजकीय द्वेषातून होत असल्याचा ठपका देखील ग्रामस्थांनी प्रशासनावर ठेवला.

या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयात मोठ्या संख्येने एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. “अतिक्रमण नोटिसा रद्द करा”, “घरकुल वाचवा”, “अन्याय बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी थेट अधिकाऱ्यांसमोर नोटिसा जाळून निषेध नोंदवला. (Vanchit bahujan aghadi)

ग्रामस्थांनी अतिक्रमण कारवाई तातडीने थांबवून सर्व रहिवाशांना नियमानुकूल करून कायमस्वरूपी संरक्षण देण्याची मागणी केली.

यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही व योग्य ती चौकशी करून न्याय्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. (Vanchit bahujan aghadi)

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्यासह रुपेश साळुंके, संगीत खरे, प्रवीण आखाडे, बबन कांबळे, मिका गायकवाड तसेच शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यात अतिक्रमणाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


       
Tags: JusticeMaharashtraPoliticalpolticsprotestVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

पालोदमध्ये परिवर्तनाची लाट! सुजात आंबेडकरांच्या सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Next Post

औरंगाबाद: जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण आणि दर्जेदार आरोग्य सुविधा हेच आमचे लक्ष्य – सुजात आंबेडकर

Next Post
औरंगाबाद: जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण आणि दर्जेदार आरोग्य सुविधा हेच आमचे लक्ष्य – सुजात आंबेडकर

औरंगाबाद: जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण आणि दर्जेदार आरोग्य सुविधा हेच आमचे लक्ष्य - सुजात आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा
बातमी

स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा

by mosami kewat
August 10, 2026
0

मनमाड : शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी प्रशासकीय काळात बसविण्यात आलेले रबरी व फायबरचे स्पीड ब्रेकर अवघ्या काही...

Read moreDetails
मांडेगाव येथे 'जय भीम बुद्ध विहारा'चे छत कोसळले; सुदैवाने बालके बचावली! ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे बौद्ध समाजात तीव्र संताप, १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा.

मांडेगाव येथे ‘जय भीम बुद्ध विहारा’चे छत कोसळले; सुदैवाने बालके बचावली! ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे बौद्ध समाजात तीव्र संताप, १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा.

August 10, 2026
ईश्वरनगर, दिघा येथे शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश

ईश्वरनगर, दिघा येथे शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश

August 10, 2026
ज्येष्ठ चित्रकार अन् कवी श्रीधर अंभोरे यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

ज्येष्ठ चित्रकार अन् कवी श्रीधर अंभोरे यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

August 10, 2026
मुंबईची बेस्ट (BEST) becoming worst ! 

मुंबईची बेस्ट (BEST) becoming worst ! 

August 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home