Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Nashik : अंत्यसंस्कारासाठी ‘छत्री’चा आधार! – शिंगवे बहुला येथील स्मशानभूमीची दयनीय अवस्था

mosami kewat by mosami kewat
September 29, 2025
in बातमी
0
Nashik : अंत्यसंस्कारासाठी ‘छत्री’चा आधार! – शिंगवे बहुला येथील स्मशानभूमीची दयनीय अवस्था
       

नाशिक : नाशिक तालुक्यातील शिंगवे बहुला येथे स्मशानभूमी असूनही मृतदेहांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मरणातूनंतरही अवहेलना सहन करावी लागत आहे. येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड वॉर्ड क्रमांक ७ मधील स्मशानभूमीच्या शेडला गेल्या २५ वर्षांपासून पत्रे नसल्याने, उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ नागरिकांवर आली आहे. भरपावसात अंत्यसंस्कारासाठी चक्क छत्रीचा आधार घ्यावा लागत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.

शिंगवे बहुला येथील स्मशानभूमी केवळ एक सांगाडा बनली आहे. छताला पत्रे नसल्यामुळे पाऊस, ऊन आणि वाऱ्यापासून कोणतेही संरक्षण नाही. नुकतेच, अल्प आजाराने निधन झालेल्या तुकाराम गोपाळा पाळदे या ज्येष्ठ नागरिकांच्या अंत्यसंस्कारावेळी ही भीषण परिस्थिती पुन्हा अनुभवयास मिळाली.

पावसात भिजल्या चितेसाठीच्या लाकडा…

सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अंत्यविधीसाठी रचलेली लाकडं पूर्णपणे ओली झाली. पाऊस थांबेल याची वाट पाहण्यात बराच वेळ गेला, पण पाऊस काही थांबला नाही. अखेरीस, अंत्यसंस्कार करायचा कसा, असा मोठा प्रश्न कुटुंबीयांसमोर उभा राहिला. अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांनाही छत्रीचा आधार घेऊनच उभे राहावे लागले.

एका बाजूला आधुनिक सुविधांची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे स्मशानभूमीसारख्या मूलभूत ठिकाणीही पत्र्यांसाठी २५ वर्षांची प्रतीक्षा करावी लागणे, हे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते.


       
Tags: MaharashtranashikVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

अतिवृष्टीने डाळिंब बागा उद्ध्वस्त: सांगोला निर्यातक्षम डाळिंबाचे १ हजार कोटींचे नुकसान!

Next Post

Kolhapur : उदगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post
Kolhapur : उदगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

Kolhapur : उदगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
फक्त ध्वजारोहणासाठी पालकमंत्री नकोत; जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हवेत : वंचित बहुजन आघाडी
बातमी

फक्त ध्वजारोहणासाठी पालकमंत्री नकोत; जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हवेत : वंचित बहुजन आघाडी

by mosami kewat
August 15, 2026
0

कळमनुरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ कळमनुरी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात निषेध...

Read moreDetails
कळमनुरी: वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे मूकबधिर विद्यालयात फळवाटप करून स्वातंत्र्यदिन साजरा

कळमनुरी: वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे मूकबधिर विद्यालयात फळवाटप करून स्वातंत्र्यदिन साजरा

August 15, 2026
कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक महिलांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक महिलांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

August 15, 2026
वंचित बहुजन महिला आघाडीच्या वळसंग (दक्षिण सोलापूर) शाखेचे उत्साहात उद्घाटन

वंचित बहुजन महिला आघाडीच्या वळसंग (दक्षिण सोलापूर) शाखेचे उत्साहात उद्घाटन

August 15, 2026
शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

August 15, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home