Kalyan-Nagar Highway Accident: ठाणे जिल्ह्यातील कल्याण-नगर महामार्गावर आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने राज्य हादरले आहे. रायते गावाजवळील नव्या पुलाजवळ दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाडहून कल्याणकडे प्रवासी घेऊन येणारी इको गाडी सकाळी सुमारे ११ वाजता घटनास्थळी पोहोचली असताना हा अपघात घडला. धडक इतकी तीव्र होती की गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. त्यामुळे आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. (Kalyan-Nagar Highway Accident)
Also Read : नांदेडमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, माहिती मिळताच पोलीस व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
कल्याण तालुका व टिटवाळा पोलिसांनी बचावकार्य हाती घेत जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवले. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत आणि जखमी बहुतेक जण मुरबाड परिसरातील असल्याचे समोर आले आहे. (Kalyan-Nagar Highway Accident)
Also Read : साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी
घटनास्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून अधिक तपास सुरू आहे.
अमेरिकन निवडणुकांचे गणित आणि इराणचे निमित्त; ट्रम्प यांचा ‘डिफ्लेक्शन’ गेम!
- संजीव चांदोरकर आंतरराष्ट्रीय अर्थकारण / राजकारणात “कच्चा लिंबू” देखील नसणाऱ्या पाकिस्तानची निवड हेतूतः केली गेली होती. अमेरिकेतील सहा महिन्यानंतर...
Read moreDetails






