Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

कुठे आहे सरकारचे आपत्ती व्यवस्थापन?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 11, 2021
in राजकीय
0
       

कोरोना विषाणूची दुसरी लाट आली आहे, पुन्हा कडक लॉकडॉऊन लावण्यात येईल अशी चिन्हे दिसत आहेत. पण लॉकडॉऊन पुन्हा लागला तर त्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकार जनतेला हव्या त्या जीवनावश्यक सुविधा पुरविण्यास तयार आहे का? सरकार सुविधा पुरविण्यास समर्थ आहे की नाही? यावर आता जनतेने विचार करायची वेळ आलेली आहे.

मार्च 2020 मध्ये भारतात पूर्णपणे लॉकडॉऊन लावण्यात आला तेंव्हा हजारो किलोमीटर पायपीट करत आपल्या गावी जाणारे लाखो मजूर आपण पाहिलेत. पुरेश्या वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे आजारी पडणाऱ्या जनतेचे हाल आपण बघितलेत. धंदा बंद, नौकरी बंद, दुकान बंद, पगार बंद यामुळे आर्थिक विवंचना तर सर्वांनीच भोगलीय. कामगार आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांचे झालेले हाल जगजाहीर आहेत. लॉकडॉऊन केल्यानंतर अश्या आपात्कालीन परिस्थितीसाठी त्यावेळी सरकार तयारच नव्हती कारण सरकारने आपात्कालीन व्यवस्थेचा कधी विचारच केला नव्हता. आजची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नाही.

आज घडीला महाराष्ट्रात 6 लाख पेक्षा जास्त कोविड पेशंट आहेत, रोज कमीतकमी 10 हजार पेक्षा जास्त लोकांना कोविडची लागण होत असल्याचे समोर आले आहे. आता पुन्हा लॉकडॉऊन लावायच्या चर्चा सरकार कडुन सुरू झाल्या आहेत. मागच्या वर्षी उद्भवलेल्या परीस्थितीत लॉकडॉऊन नंतर जनतेला जो त्रास झाला तो त्रास पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने आपल्या आपात्कालीन व्यवस्थेत काही सुधार केल्याचे दिसत नाही. आजही रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत, औषध उपलब्ध नाहीत, लसीकरणासाठी लस उपलब्ध नाहीत. पुन्हा लॉकडॉऊन झाल्यास मजूर, कामगार वर्गाचे हाल होऊ नयेत याची काही व्यवस्था नाही. मागच्या वर्षी सामाजिक संघटनांनी, वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाने आणि अनेक लोकांनी वैयक्तिक पातळीवर गरजूंना मदत केली पण आता मदत करणारेही आर्थिक पातळीवर हतबल झालेले आहेत. अश्यात पुन्हा लॉकडॉऊन लागल्यास जनतेने कसे जगावे याचे उत्तर सरकारकडे नाही.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनि एकमेकांवर कुरघोड्या करण्यात वेळ वाया घालवून महाराष्ट्राला पुन्हा मोठ्या संकटात ढकलले आहे. एक वर्षात सरकारने आपात्कालीन व्यवस्थापनाच्या दिशेने काय केले याचा जाब विचारणे आता क्रमप्राप्त झाले आहे.


       
Tags: Congresscoronacovid19lockdownMaharashtramaharashtrgovernmentmahavikasaghadimigrationmodimumbaiNCPShivsenaVanchit Bahujan Aaghadivbaअर्थव्यवस्थाकोरोनाकोविड-१९
Previous Post

२२ वर्षां पूर्वीची बाळासाहेब यांची मुलाखत

Next Post

निऋतीच्या लेकीच्या हातावरील घट्टे पहिले जाणार का ?

Next Post
निऋतीच्या लेकीच्या हातावरील घट्टे पहिले जाणार का ?

निऋतीच्या लेकीच्या हातावरील घट्टे पहिले जाणार का ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भाजपने सर्वांनाच गंडवले आहे! – ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

भाजपने सर्वांनाच गंडवले आहे! – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
September 4, 2025
0

मुंबई : महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा...

Read moreDetails
कोथरूड प्रकरण : पिडीत मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी न्यायालयात; पुढील सुनावणी 15 सप्टेंबर रोजी!

कोथरूड प्रकरण : पिडीत मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी न्यायालयात; पुढील सुनावणी 15 सप्टेंबर रोजी!

September 4, 2025
भ्रष्ट क्लासेसविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; बार्टीने सात दिवसांत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

भ्रष्ट क्लासेसविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; बार्टीने सात दिवसांत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

September 4, 2025
संविधानाने दिलेल्या समतेचा समाज घडविण्यासाठी समता सैनिक दल काम करणार – ॲड. एस. के. भंडारे‎‎

संविधानाने दिलेल्या समतेचा समाज घडविण्यासाठी समता सैनिक दल काम करणार – ॲड. एस. के. भंडारे‎‎

September 4, 2025
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी; मालेगावात अंजलीताई आंबेडकर यांचा संवाद दौरा संपन्न

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी; मालेगावात अंजलीताई आंबेडकर यांचा संवाद दौरा संपन्न

September 3, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home