Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

डिसेंबर 2025 अखेरपर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 9, 2025
in बातमी
0
डिसेंबर 2025 अखेरपर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर
       

पुणे : डिसेंबर 2025 अखेरपर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात प्रधानमंत्री सूर्य घर योजना देखील प्रभावीपणे राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते पार पडले. यावेळी महाऊर्जासाठी दोन उद्दिष्टे महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याला गती देणार, तसेच प्रधानमंत्री सुर्यघर योजनेप्रमाणे त्या योजनेशी संलग्न असलेली राज्याची योजना सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये पहिल्या टप्प्यात 100 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक तर दुसऱ्या टप्प्यात 300 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक सौर ऊर्जेवर आणायचे आहेत. 300 युनिटपर्यंत वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीज देयक शून्यावर यावे, असा प्रयत्न आहे. ही दोन्ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासंदर्भात महाऊर्जा हे काम चांगल्यारितीने करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सौर ऊर्जेच्या वापरामुळे वीजेचे दर कमी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाऊर्जाने गेल्या काही वर्षात अपारंपरिक ऊर्जा निर्माण करण्यात चांगली कामगिरी केली आहे. 2026 च्या डिसेंबरपर्यंत कृषी क्षेत्राची संपूर्ण वीज मागणी सौर ऊर्जेवर परिवर्तित करू शकू. गेल्या 20 वर्षात दरवर्षी वीजेचे दर 9 टक्क्याने वाढवत आहोत. मात्र 2025 ते 2030 या कालावधीमध्ये दरवर्षी वीजेचे दर कमी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


       
Tags: allDecember 2025endenergygovernmentMaharashtraofficessolarstateusing
Previous Post

बंगळुरू पोलिस आयुक्तांसह अनेक पोलिस अधिकारी निलंबित, आरसीबीच्या कंपनीविरोधात गुन्हा, कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा

Next Post

राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार

Next Post
राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार

राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे अभिवादन कार्यक्रम
बातमी

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे अभिवादन कार्यक्रम

by mosami kewat
November 15, 2025
0

औरंगाबाद : शौर्य, प्रतिकार आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीच्या पश्चिम विभागातर्फे...

Read moreDetails
COP-30 मधून उघड झालेले सत्य : पर्यावरणाचे रक्षण नव्हे, नफ्याची शर्यत

COP-30 मधून उघड झालेले सत्य : पर्यावरणाचे रक्षण नव्हे, नफ्याची शर्यत

November 15, 2025
बिहार निवडणूक निकालावर प्रकाश आंबेडकरांचे मोठं वक्तव्य; काँग्रेसने दलित आणि हिंदू मतदारांचा विश्वास गमावला!

बिहार निवडणूक निकालावर प्रकाश आंबेडकरांचे मोठं वक्तव्य; काँग्रेसने दलित आणि हिंदू मतदारांचा विश्वास गमावला!

November 15, 2025
संविधान सन्मान महासभेच्या तयारीची मुंबईत आढावा बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन

संविधान सन्मान महासभेच्या तयारीची मुंबईत आढावा बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन

November 15, 2025
श्रीनगरजवळ पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट; 'व्हाईट-कॉलर' दहशतवादी मॉड्यूलकडून जप्त केलेल्या स्फोटकांमुळे ९ जणांचा मृत्यू

श्रीनगरजवळ पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट; ‘व्हाईट-कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलकडून जप्त केलेल्या स्फोटकांमुळे ९ जणांचा मृत्यू

November 15, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home