Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

कोण फक्त मतांसाठी जवळ येते आणि
कोण दलितांसाठी लढतेय ते ओळखा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 6, 2024
in राजकीय
0
कोण फक्त मतांसाठी जवळ येते आणिकोण दलितांसाठी लढतेय ते ओळखा
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन आघाडी तुमच्यासाठी लढत आहे आणि लढणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला जाहीर झाला. त्याच वेळी दलितांनी कोणाला मतदान केले हे स्पष्ट झाले होते. पण, तुमच्यासाठी कोण लढतेय आणि तुमची बाजू कोण मांडतेय? ते ओळखा त्याची वास्तविकता समजून घ्या असे ट्विट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडी तुमच्यासाठी लढत आहे, तुमच्यासाठीच लढणार आणि यापुढेही लढत राहील, असेही यामध्ये त्यांनी म्हटले आहे.

ॲड. आंबेडकरांनी मांडलेले मुद्दे

1️- निवडणूक निकालाच्या दोन दिवसानंतर बीएमसीने पवईच्या जय भीम नगर परिसरातील 700 हून अधिक घरे पाडली.

कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते सर्वांत आधी घटनास्थळी दाखल झाले होते? तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तिथे होते.

आमच्या मुंबईच्या टीमने या दलितविरोधी अभियानाचा निषेध तर केलाच, पण जय भीम नगरमधील विस्थापित रहिवाशांचा लढा लढण्यासाठी कायदेशीर टीमही तयार केली.

2️- पवित्र दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्कींग प्रकल्पाचे काम गेल्या काही आठवड्यांपासून सुरू होते. यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेतृत्वाने एक तरी शब्द उच्चारला का? वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील बौद्धांसह या घटनेला विरोध केला आणि त्यामुळेच या प्रकल्पाला स्थगिती मिळाली. त्यानंतरच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला जाग आली.

पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले, ज्यात आमचे वंचित बहुजन आघाडीचे नागपूर अध्यक्ष आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. एवढे होऊनही त्यांच्या नेतृत्वाकडून बौद्ध आंदोलकांसाठी एकही शब्द निघाला नाही.

3️- महाराष्ट्रभरातील दलितांना घरे खाली करण्यासाठी आणि गायरान जमिनीवरील पिके काढून टाकण्यासाठी नोटिसा पाठविल्या जात होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना त्यांच्या मदतीला आले का? त्यांनी एक तरी शब्द उच्चारला का? काल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अतिक्रमण म्हणून घोषित करण्यात आलेली घरे आणि लागवडी खालील पिकांना संरक्षण मिळण्याची मागणी केली होती , जी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.

याचबरोबर दीक्षाभूमीच्या आंदोलकांवरील गुन्हे रद्द करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. निकाल जाहीर होऊन महिना व्हायचा होता आणि तुम्ही ज्या पक्षांना मतदान केले त्या सर्व पक्षांनी तुम्हाला डावलले आहे. कुठलीही राजकीय ताकद नसताना वंचित बहुजन आघाडीने दलितांसाठी लढा दिला आणि त्यांनी एक शब्दही काढला नाही.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, फक्त कल्पना करा, महाराष्ट्रातील राजकीय सत्ता वंचित बहुजन आघाडीच्या हाती आल्यास काय होऊ शकते. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा मुखवटा घालणाऱ्यांपासून सावध राहा. हे पावसाळ्यात निघणाऱ्या किड्यांसारखे आहेत. निवडणुका संपल्या आणि हे गायब होतात.


       
Tags: MaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट !

Next Post

दलित- आदिवासींचा निधी
काँग्रेसने इतरत्र वळवला..!

Next Post
दलित- आदिवासींचा निधीकाँग्रेसने इतरत्र वळवला..!

दलित- आदिवासींचा निधी
काँग्रेसने इतरत्र वळवला..!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‎देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
बातमी

‎देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

by mosami kewat
July 22, 2025
0

‎मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे...

Read moreDetails
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत; अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत; अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान

July 22, 2025
नालासोपारा जवळच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर आढळला; तपास सुरू

नालासोपारा जवळच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर आढळला; तपास सुरू

July 22, 2025
'रमी' प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; कृषिमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा- वंचितची मागणी

‘रमी’ प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; कृषिमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा- वंचितची मागणी

July 22, 2025
प्रवाशांसाठी खुशखबर! आता 'भारत गौरव यात्रा' रेल्वे प्रवासाचं स्वप्न EMI वर करा पूर्ण

प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘भारत गौरव यात्रा’ रेल्वे प्रवासाचं स्वप्न EMI वर करा पूर्ण

July 22, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home